• Login
Monday, February 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

गुंत्यांची उकल म्हणजे विज्ञान 

Varsha Mehata by Varsha Mehata
February 27, 2023
in संपादकीय, संपादकीय लेख
0 0
0
…तर पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकू!
0
SHARES
29
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

उत्पल वबा

विज्ञान जिथे संपते तिथे अध्यात्म सुरू होते असे उद्गार इस्त्रांच्या वैज्ञानिकाने अलीकउेच पुण्यात काढले होते. पण खरे तर विज्ञान हे अथांग आहे आणि त्याचा कोठेही व कधीच अंत होत नसतो. ‘जिथे विज्ञान संपतं तिथे अध्यात्म सुरु होतं’ या एका चांगल्यापैकी प्रचलित विधानावर आज एक मीम केलं होतं. पण या विधानाच्या संदर्भाने थोडं लिहावं असं वाटतं.  विज्ञान ‘संपणं’ आणि अध्यात्म ‘सुरु होणं’ या मांडणीत मुळातच एक महान गडबड आहे हे आपल्या लक्षात यायला काहीच हरकत नाही. पण विज्ञान एका ठिकाणावर येऊन ‘संपतं’ असा एक घट्ट समज करून दिला गेला आहे आणि त्यामुळे अनेकांना ते खरं आहे, योग्य आहे असं वाटत असतं. अध्यात्माची महती सांगताना विज्ञान शेवटी कुठेतरी ‘संपतं’ हे वारंवार ठसवून सांगितलं जातं आणि विज्ञान शेवटी एकदाचं ‘संपत’ असल्याने कडवे धार्मिक-श्रद्धाळू लोक सुटकेचा निश्‍वास टाकत असतात. एकूणातच आपल्याकडील सामाजिक डिस्कोर्समध्ये विज्ञानाच्या पलिकडे काही आहे, ते आपल्याला कळणार नाही, शेवटी अध्यात्म महत्त्वाचंच, हे विज्ञानवाले स्वतःला फार शहाणे समजतात ही गृहीतके स्पष्ट-अस्पष्टपणे नांदत असतात. (काही वर्षांपूर्वी आलेला ‘देऊळबंद’ हा चित्रपट याचं एक चांगलं उदाहरण आहे). मीममध्ये ‘विज्ञान संपल्यानंतर’ असं म्हटलेलं असलं तरी तो विनोदाचा भाग आहे हे लक्षात घेऊया. विज्ञान (किंवा अध्यात्मही) असं ‘संपत’ नसतं. विज्ञान म्हणजे काय? विज्ञानाची व्याख्या कशी करायची यावर पुष्कळ मटेरियल उपलब्ध आहे. ते वाचता येऊ शकेल. ते इथे सांगत नाही. मला जे आकलन होतं, जे जाणवतं ते सांगतो. विज्ञान याचा अर्थ ‘घटितांमागच्या कारण-परिणामांच्या साखळीची उकल’ असा करता येईल. ‘जे आहे’ ते तसं का आहे, ‘जे आहे’ त्याचं स्वरूप नक्की काय आहे याचा विज्ञान हा शोध आहे. पण सृष्टीत ज्या हजारो घडामोडी होतात त्यातील काहींची उकल होत नसेल तर त्या ‘विज्ञानाच्या कक्षेबाहेर’ आहेत असं जेव्हा कुणी म्हणतं तेव्हा साध्या भाषेत सांगायचं तर ते ‘हात टेकणं’ असतं. हात टेकायला काहीच हरकत नाही. आपल्याला सगळ्यातलं सगळं कळू शकत नाहीच. पण टेकलेले हात लगेच वर उचलून अध्यात्माचा जयघोष करण्याची जी घाई होते ती गंमतशीर आहे! आपण गूढाच्या प्रांतात फार झटकन जातो. विशेषतः भारतीयांना तर या प्रांतात रमायला फार आवडतं. (आणि गूढाच्या प्रांतात जाऊन उकल होते असंही नाही. तिथे असतं फक्त कुठल्यातरी अज्ञात शक्तीचं वर्चस्व मान्य केल्याचं समाधान. ‘अरे पण गच्चीचा काय?’ या प्रश्‍नाचं उत्तर कुणी देत नाही. गच्ची ही कशी माया आहे असं काहीतरी सांगत बसतात). मला वाटतं सगळा घोळ तिथे आहे. विज्ञान नावाची वेगळी काढून दाखवण्याजोगी वस्तू नाही. तो एक अप्रोच आहे. विचारपद्धती, ‘उकलपद्धती’ आहे. प्रचंड गुंतागुंतीच्या सृष्टीची उकल करायची झाली तर तिथे प्रचंड दमाने थांबायला लागेल (जे शास्त्रज्ञ करतात). सृष्टी ही एक प्रचंड गुंतागुंतीची व्यवस्था आहे. अगदी जैव सृष्टीपासून मानवनिर्मित व्यवस्थांपर्यंत. म्हणजे माणसाच्या गुणसूत्रांच्या रचनेचा अभ्यास करणारी विद्याशाखा असो की अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाचा अभ्यास करणारी विद्याशाखा असो- जी काही गुंतागुंत आहे ती समजून घ्यायचा आटोकाट प्रयत्न ज्या ‘पद्धती’मार्फत होत असतो त्याला ‘विज्ञान’ हे नाव देता येईल. गुंतागुंत अस्तित्वात आहे म्हणजे त्याची उकल अस्तित्वात असलीच पाहिजे. प्रश्‍न फक्त त्या उकलीपर्यंत पोचण्याचा आहे. आणि विज्ञान ही ’पद्धती’ किमान तसा प्रयत्न तरी करत असते. त्यात किती यश येतं हा पुढचा मुद्दा. नरहर कुरुंदकरांनी ’शिवरात्र’मधील एका प्रकरणात गांधी आणि फाळणीबद्दल लिहिताना गांधींना फाळणी थांबवण्यात अपयश आलं हे कबूल पण त्यांनी तसा आटोकाट प्रयत्न केला, ते लढले आणि जे युद्धात उतरलेच नाहीत त्या हिंदुत्ववाद्यांनी मात्र गांधींना नावं ठेवण्यापलीकडे काही केलं नाही अशा आशयाचा मजकूर लिहिला आहे. यात गांधींच्या जागी विज्ञानाला, फाळणीच्या जागी सृष्टीच्या गुंतागुंतीला आणि हिंदुत्ववाद्यांच्या जागी विज्ञान ‘संपल्या’वर बरं वाटणार्‍यांना ठेवलं की मुद्दा पुरेसा स्पष्ट होतो! माणसाच्या अनुभूतीच्या कक्षेत व्यक्त-अव्यक्त अशा बर्‍याच गोष्टी येतात. माणसाचं मन हे भावना-विचारांची निर्मिती करणारं ‘यंत्र’ आहे आणि काहीजणांना जी अनुभूती येते ती एका वेगळ्या प्रतीची असते, ती माणसं इतरांपेक्षा काही वेगळी असू शकतात/भासू शकतात हे मान्य आहे. त्यामुळे अध्यात्माबाबत बोलायचं झालं तर माणसाच्या जाणिवेचं ते एक क्षेत्र आहे, त्याचं आपलं असं एक स्थान आहे, सतत कार्यरत असलेल्या मनाच्या ‘यंत्रा’ला विसावा मिळेल, दिशा मिळेल, उभारी मिळेल असं ते एक क्षेत्र आहे हे नाकारण्यात काहीच मतलब नाही. पण म्हणून जड जगाची – भौतिक द्रव्यांनी बनलेल्या जगाची उत्तरे – या आध्यात्मिक क्षेत्रातून कशी मिळतील? तिथे मिळालीच तर संकल्पनात्मक उत्तरं मिळू शकतील. ’सत्य’ उत्तरं मिळतील का हा मोठाच प्रश्‍न आहे. अध्यात्म ही खरं तर एक ’बिलीफ सिस्टीम’ आहे असं मी म्हणेन. त्याला मनाची आवश्यकता म्हणता येईल; पण अगदी मनाच्यादेखील स्वरूपाची ’भौतिक उकल’ करण्याची पद्धत अखेरीस विज्ञान हीच आहे. (वर ’माया’चा उल्लेख केला आहे म्हणून नोंदवतो. शंकराचार्यांचा मायावाद किंवा भारतीय आणि पाश्‍चिमात्त्य तत्वज्ञानातील इतर दर्शने मला स्वतःला अतिशय आकर्षित करतात. पण तो माझ्या ‘फिलॉसॉफिकल क्वेस्ट’चा प्रांत आहे. माझा ‘वर्ल्ड व्ह्यू’ तयार होण्याचा प्रांत आहे. आपल्या असण्याला मी माझ्या विचारांनी आकार देईन, माझी नैतिक दृष्टी तयार करेन हा त्यामागील ध्यास आहे. माझ्या स्वतःच्या आणि जड सृष्टीच्याही भौतिक स्वरूपाबाबत अंतिम विधान मी तिथे करणार नाही. किंबहुना ते उत्तर मला तिथे मिळेल असं मी मनात धरलेलंच नाही). थोडक्यात ‘जिथे विज्ञान संपतं तिथे अध्यात्म सुरु होतं’ या चमकदार वाक्यामुळे आपली दिशाभूल करून घेऊ नये. सायंटिफिक टेम्परामेंट नावाचा इसम आपल्याकडे आधीच दारिद्य्ररेषेखाली आहे. अशी चमकदार वाक्यं त्या बिचार्‍याला ती रेषा कधीच ओलांडू देणार नाहीत!
भारतात दरवर्षी 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. विज्ञानाच्या फायद्यांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्यासाठी ’राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद’ आणि ’विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या’ अंतर्गत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो.
रामन इफेक्टचा शोध लागल्याने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. या शोधाची घोषणा भारतीय शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकटरामन यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी केली होती. या शोधाबद्दल त्यांना 1930 मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले होते.

सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर 1987 साली भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव असताना त्यांनी ज्या अनेक योजना सुरू केल्या त्यातील एक योजना म्हणजे देशात विज्ञानाचे वातावरण निर्माण करण्यासाठी दरवर्षी 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणे.  डॉ. वसंतराव गोवारीकरांच्या मनात आले की भारतात विज्ञानाचा एकमेव नोबेल पुरस्कार डॉ. सी. व्ही. रामन यांना मिळाला आहे, तर त्यांच्याशी संबंधितच तो दिवस असावा. शिवाय तो त्यांचा जन्म अथवा मृत्युदिन निवडण्यापेक्षा त्यांनी ज्या दिवशी त्यांचा निबंध जगप्रसिद्ध ‘नेचर’ या विज्ञान मासिकाला पाठवला आणि ज्याला पुढे 1930 साली नोबेल पुरस्कार मिळाला ती तारीख का निवडू नये? अखेर ती तारीख निघाली 28 फेब्रुवारी.

Related

Tags: alibageditorial articlemarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

सिसोदियांची अटक

Next Post

खारकोपर येथे रेल्वेचे डब्बे रुळावरून घसरले

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी – भाग 1
पोलादपूर

दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी – भाग 1

July 25, 2025
Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले
sliderhome

Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले

April 2, 2025
वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील
sliderhome

वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील

March 18, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका
रायगड

अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका

March 8, 2025
Next Post
खारकोपर येथे रेल्वेचे डब्बे रुळावरून घसरले

खारकोपर येथे रेल्वेचे डब्बे रुळावरून घसरले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?