• Login
Thursday, August 14, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

नव्या भाडेकरार कायद्याच्या निमित्ताने…

Varsha Mehata by Varsha Mehata
July 1, 2021
in संपादकीय, संपादकीय लेख
0 0
0
0
SHARES
47
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

डॉ. उदय निरगुडकर

एखादं घर भाड्याने देण्याशी किंवा घेण्याशी प्रत्येकाचा कधी ना कधी तरी संबंध येतोच. आपण कधी विद्यार्थी म्हणून शिकायला परगावी गेल्यानंतर किंवा नोकरीनिमित्ताने तात्पुरत्या वास्तव्यासाठी दुसर्‍या शहरात गेल्यानंतर घर भाड्याने घ्यावं लागतं. अनेकजण गुंतवणूक म्हणून सेकंड होम घेतात आणि भाड्याने देतात. एखादी पिढीजात मालमत्ता उत्पन्नाचं साधन म्हणून भाड्याला लावली जाते. म्हणूनच केंद्र सरकारने नुकताच आणलेला मॉडेल टेनन्सी अ‍ॅक्ट म्हणजे भाडेकराराविषयीचा नवा कायदा प्रत्येक व्यक्तीसाठी महत्त्वाचा आहे. अर्थातच 2019 मध्ये या कायद्याचा कच्चा मसुदा सादर करण्यात आल्यानंतर याबाबत चर्चा सुरू झाली होती. खरं तर भाडेकरू ठेवणं ही कटकटीची बाब असल्याचं घरमालकांचं ठाम मत आहे तर दुसरीकडे घरमालक हे कटकटे, माजोरडे आणि जमीनदार वृत्तीचे असतात असं तमाम भाडेकरूंचं मत आहे. आपल्याकडच्या भाड्याशी संबंधित 30 ते 40 वर्षांपूर्वीच्या जुन्या कायद्यांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. या कायद्यांच्या मुळाशी एक प्रकारची शोषण व्यवस्था, एक प्रकारचा अविश्‍वास आणि कालबाह्यता ठासून भरली असल्यामुळे प्रत्येकाला कधी ना कधी याचा सामना करावा लागतो आणि त्यातून शोषणाला बळी पडावं लागतं. म्हणूनच सरकारने नवा कायदा आणून या व्यवस्थेला नेटकं रुप देण्याचा प्रयत्न केला आहे, असं सकृतदर्शनी म्हणावंसं वाटतं.
2022 पर्यंत देशातल्या सर्व नागरिकांच्या डोक्यावर छप्पर म्हणजे रहायला घर असावं अशा पद्धतीचं केंद्र सरकारचं धोरण आहे. सध्या खूप मोठ्या प्रमाणावर काहीसं विस्कळीत, अनियंत्रित असलेलं मालमत्ता क्षेत्र अशी घरं बांधण्याची जबाबदारी पूर्ण करताना दिसत आहे. सरकारी पातळीवर प्रयत्न होत असले तरी आजघडीला संपूर्ण देशात हजारो नव्हे तर लाखो घरं बांधून तयार असून रिकामी आहेत. सध्या अस्तित्वात असणार्‍या कायद्यांमुळे घर भाड्याला लावणं घरमालकांना जोखमीचं वाटतं तर भाड्याच्या घरात राहणं भाडेकरूंनादेखील कटकटीचं वाटत असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आपल्या मातृभूमीत एक घर असावं असा विचार करून घेतलेलं घर भाड्याने देताना परदेशस्थ नागरिक बिचकतात तर चार पैसे हाती आल्यानंतर भविष्याची तरतूद म्हणून किंवा गुंतवणूक म्हणून आणखी एक घर हवं, भविष्यात मालमत्तेच्या किंमती वाढल्यानंतर त्यातून फायदा मिळेल या उद्देशाने बांधलेली घरं आज रिकामी पडली आहेत आणि दुसरीकडे घर नाही म्हणून अनेकजण वणवण करत फिरत असल्याचं, रस्त्यावर रहात असल्याचं चित्र आपल्याला दिसून येतं.
हे चित्र बदलण्याच्या दृष्टीने आलेल्या या कायद्याचं स्वागत करायचं म्हटलं तरी त्याची अंमलबजावणी करताना चार मोठी आव्हानं समोर दिसतात. भारत सरकारच्या कॅबिनेटने या नव्या कायद्याला मान्यता दिली असली तरी यातून 2022 पर्यंत सर्वांसाठी घर आणि या व्यवस्थेत एकूणच असणारा विस्कळीतपणा आणि असंतुलित व्यवहार दूर होईल का, हा खरा प्रश्‍न आहे. आपल्याकडे आत्ता भाडेनियंत्रण कायदा अस्तित्वात असल्यामुळे मुंबईसारख्या ठिकाणी अत्यंत मोक्याच्या ठिकाणी नाममात्र भाडं देऊन भाडेकरू पिढ्यानपिढ्या रहात असल्याचं दिसून येतं. मात्र या इमारतींची कोणत्याही पद्धतीने दुरूस्ती होत नाही आणि दर वेळी पावसाळ्यात अशा जुन्या आणि मोडकळीला आलेल्या अतिधोकादायक इमारती कोसळून अनेकजण बेघर होतातच शिवाय अनेकजण जीवही गमावून बसतात. परंतु, अशा इमारतींशी संबंधित अस्तित्वात असलेले कायदे आजची आव्हानं पेलण्यास कुचकामी असल्याचं समोर येतं. इतक्या तुटपुंज्या भाड्यात आम्ही इमारतीची दुरुस्ती करू शकत नाही, असं म्हणून घरमालक हात झटकतात तर त्याच वेळी या घरासाठी अधिक भाडं देण्याची आमची तयारी नाही असं भाडेकरू बोलून दाखवतात.
ही मोडकळीला आलेली संपूर्ण व्यवस्था बदलण्यासाठी नवा कायदा आणणं अत्यंत आवश्यक होतं. मुळात निर्बंध या शब्दापासून दूर जाऊन या कायद्यामुळे आपण एक प्रकारच्या नियंत्रणापर्यंत जाऊ शकतो का, या प्रश्‍नाचं उत्तर ‘हो’ असं आहे. तसंच या संपूर्ण भाडेकराराच्या व्यवसायाला यामुळे एक प्रकारची अधिकृतता येईल का, तर त्याचंही उत्तर ‘हो’ असंच आहे. परंतु, हा सगळा व्यवहार, हा संपूर्ण उद्योग सकारात्मक पद्धतीने पुढे जाईल का, याबाबत नेमकं काहीच सांगता येत नाही. याबाबतचं प्रश्‍नचिन्ह अद्याप कायम आहे. याचं कारण म्हणजे शेकड्यातले फक्त 20 ते 25 टक्के करारपत्रांची नोंदणी केली जाते, उर्वरित सगळे तोंडी व्यवहार असतात आणि त्यात प्रत्येकजण आपापल्या सोयीने कलमं टाकतो आणि तिथेच कुठे तरी पिळवणुकीला सुरूवात होते. या कायद्यामुळे यावर काही उपाय दिसत नसल्याने पदरी निराशा येते असं म्हणावं लागेल. नव्या कायद्यामुळे भाडेकरारातून होणार्‍या कज्जेदलालीसाठी तीन प्रकारची व्यवस्था करण्यात आली असून यात सर्वोच्च पातळीवर रेंट ट्रिब्युनल, त्याआधी रेंट अ‍ॅथोरिटीचे दोन टप्पे अशी रचना उभी रहात आहे. अर्थात त्या रचनेतून न्याय मिळेल ही अपेक्षा असून ही एक सकारात्मक बाब आहे असं म्हणत अनेक बांधकाम व्यावसायिकांनीही त्याचं स्वागत केलं आहे.
आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे आपल्याकडे प्रत्येक राज्यागणिक भाडेनियंत्रण कायदे अस्तित्वात आहेत आणि ही सगळीच व्यवस्था एक प्रकारे या क्षेत्राच्या वाढीसाठी घातक आहे. एखाद्या भाडेकरूने भाडं न देता गैरव्यवहार केले तर त्याला काढायची प्रक्रिया अत्यंत जटील आहे. तसंच घरमालकाने दिलेले शब्द फिरवून पुरेशा सोयी-सुविधा दिल्या नाहीत, वीज, पाणी यासारख्या अत्यावश्यक सेवांच्या जोडण्या कापून टाकल्या तर त्याविरोधात न्यायालयात जाण्याची प्रक्रियाही अत्यंत जटील आहे. नव्या कायद्यांमुळे या सर्व व्यवस्थेला एक कालबद्धता आणि सूत्रबद्धता लाभेल अशी अपेक्षा आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर संगणक साक्षरता येणं आवश्यक आहे. ती पहायला मिळत असली तरी अशा प्रकारच्या रचनेला अद्यापही आधार आणि पॅनसारखी कागदपत्रं का लागतात याचं उत्तर नव्या कायद्यात मिळत नाही.
इथे स्थलांतरित मजुरांचा प्रश्‍नही खूप महत्त्वाचा ठरतो. कोरोनाकाळात स्थलांतरित मजुरांचे झालेले हाल आपण पाहिले. काहीजणांनी हजारो किलोमीटर अंतर पायी कापून आपलं गाव गाठलं. या दरम्यान काहींनी प्राणही गमावले. अशा स्थलांतरित मजुरांची मुंबईसारख्या शहरातली संख्या 20 ते 25 लाखांच्या आसपास आहे, असं एक सर्वेक्षण सांगतं. इतकंच नाही, तर एका छोट्याशा खोलीत दहा ते 15 मजूर दाटीवाटीने राहतात. या मजुरांच्या हालअपेष्टा या नव्या कायद्यामुळे कमी होणार का, हा खरा सवाल आहे. याशिवाय अविवाहित, एकटे वृद्ध, लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणारे, जातीच्या उतरंडीत दुर्दैवाने खालच्या पातळीवर समजले जाणारे, अल्पसंख्याक वर्गातले आणि तृतीयपंथी यांच्या घराचे प्रश्‍न अधिक जटील आणि कठीण आहेत. हे प्रश्‍न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून हा नवा कायदा नेमकी कोणती सकारात्मकता आणणार हे तपासून पाहणं गरजेचं आहे. सामााजिकदृष्ट्या सर्वांना एकत्र आणण्यासाठी ज्या वातावरणनिर्मितीची अपेक्षा आहे, ते मात्र यातून घडताना दिसत नाही. एखाद्या करारपत्राची नोंदणी करण्यात न आल्यास कोणताही दंड आकारण्याची तरतूद या कायद्यात दिसत नाही.
मुळात दिल्लीमध्ये अशा प्रकारचा कायदा राबवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. हा कायदा अयशस्वी ठरण्यामागच्या कारणांचा अभ्यास करण्यात आला आहे का, याचादेखील विचार होणं महत्त्वाचं आहे. मुळातच भाडेकरू आणि घरमालक हा विषय राज्याच्या अखत्यारितला आहे. अर्थातच हा नवा कायदा केंद्राने केला असल्यामुळे भाजपशासीत राज्यात राबवला जाईल. मात्र बिगर भाजपशासित राज्यात तो राबवला जाईल का, हा प्रश्‍न आहे. असं असलं, तरी या कायद्याची उपयुक्तता नाकारता येत नाही. तीन महिने झाल्याशिवाय भाड्यात कोणत्याही प्रकारची वाढ करता येणार नाही आणि घरांसाठी दोन महिने तर व्यापारी जागेसाठी सहा महिन्याच्या सिक्युरिटी डिपॉझिटच्या तरतुदीचं स्वागतच करायला हवं.

Related

Tags: alibageditorial articlemarathi newspaperraigad
Previous Post

बापानेच घेतला लेकराचा जीव; आईस्क्रीममधून दिलं विष

Next Post

न्हावा बेटाचा होणार कायापालट; काय होणार बदल जाणून घ्या!

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी – भाग 1
पोलादपूर

दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी – भाग 1

July 25, 2025
Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले
sliderhome

Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले

April 2, 2025
वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील
sliderhome

वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील

March 18, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका
रायगड

अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका

March 8, 2025
Next Post
न्हावा बेटाचा होणार कायापालट; काय होणार बदल जाणून घ्या!

न्हावा बेटाचा होणार कायापालट; काय होणार बदल जाणून घ्या!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2025
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+27
°
C
+27°
+26°
Alibag
Thursday, 14
Friday
+27° +26°
Saturday
+26° +25°
Sunday
+27° +25°
Monday
+26° +25°
Tuesday
+25° +25°
Wednesday
+26° +25°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?
    Krushival news
    New
    Icon
    Icon
    ×
    Icon
    New
    Icon Krushival news
    Icon Krushival news
    Krushival news Powered by iZooto
    You have no new updates. Watch this space to get latest updates.
    Unblock notifications to start receiving real time updates. Know More
    Link copied to clipboard.