| रांची | वृत्तसंस्था |
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्या रांची येथे सुरु आहे. पहिल्या दिवशी निराशाजनक सुरुवातीनंतर दणक्यात कमबॅक करणाऱ्या इंग्लडने दुसऱ्या दिवशीही धमाका केला. इंग्लंडने पहिल्या डावात ऑलआऊट 353 धावा केल्या. भारतीय संघाची या 353 धावांच्या प्रत्युत्तरात घसरगुंडी झाली. भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 7 गडी गमावून 219 धावा केल्या आहेत. भारतीय संघ आणखी 134 धावांची पिछाडीवर आहे. आता ध्रुव जुरेल आणि कुलदीप यादव ही जोडी नाबाद आहे. तर शोएब बशीर याने 20 वर्षीय युवा गोलंदाजाने भारतीय संघाला 4 झटके देत बॅकफुटवर टाकण्याचा काम केले.
रवींद्र जडेजाने इंग्लंडला पहिल्या दिवशी झटपट 3 गडी घेत 353 धावांवर ऑलआऊट केले. मात्र, भारतीय संघाची इंग्लंडच्या 353 धावांच्या प्रत्युत्तरात दाणादाण उडाली. कर्णधार रोहित शर्मा 2 धावांवर आऊट झाला. त्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिल या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी केली. शुबमन गिल 38 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर यशस्वीने रजत पाटीदारसोबत बॅटिंग करताना अर्धशतक ठोकले.
ध्रुव आणि कुलदीप या दोघांनी आठव्या विकेटसाठी दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 42 धावांची नाबाद भागीदारी केली. ध्रुव जुरेल 58 बॉलमध्ये 30 रन्स करुन नाबाद आहे. तर कुलदीप यादव 72 चेंडूत 17 धावा करुन नाबाद आहे.