प्रवाशांचे हाल
। अलिबाग । प्रतिनिधी ।
ठाणे आणि मुंबईमध्ये होणार्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातून 75 एसटी बसेस पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक फेर्या रद्द झाल्याने प्रवाशांचे शनिवार व रविवारी हाल झाले.
ठाणे व मुंबई लोकसभा मतदारसंघातील मतदान सोमवारी 20 मे रोजी होणार आहे. त्यानिमित्ताने कर्मचार्यांसह मतदान साहित्यांची केंद्रात ने-आण करण्यासाठी रायगडमधून 75 एसटी बसेसची मागणी करण्यात आली. त्यानुसार रायगडमधून गाड्या पाठविण्यात आल्या आहेत. शनिवारपासून या गाड्या मुंबई व ठाण्यामध्ये गेल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली आहे. अलिबागसह जिल्ह्यातील अनेक आगारांतील फेर्या रद्द झाल्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागला.
नालासोपारा एसटी रद्द अलिबाग बसस्थानकातून नालासोपारा एसटी बस दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास सुटते. रविवारी काही प्रवाशांनी बसचे आगाऊ आरक्षण केले होते. मात्र, ठाणे व मुंबईमध्ये होणार्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर ही बस रद्द करण्यात आली. त्याचा फटका नालासोपाराकडे जाणार्या प्रवाशांना बसला.