| उरण | वार्ताहर |
राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यपध्दतीमध्ये नविन वर्षाच्या सुरुवातीला “रस्ते वाहतुकीत सुरक्षीत प्रवास“ या अभियानाचा शुभांरभ करण्यात आला. रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी महामंडळाकडून दरवर्षी अपघात नियंत्रण उपाययोजना राज्यभर राबविण्यात येते. उरण तालुक्यातील जेष्ठ साहित्यीक एल बी. पाटील, द्रोणागिरी स्पोर्टस क्लब असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत , ग्राम अध्यक्ष मोहन भोईर व मुंबई विभागाचे विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी राजेंद्र भामरे यांनी सुरक्षितता मोहीम फलकाचे अनावरण केले.
अपघात विरहीत सेवा कर्तव्य देणारे जेष्ठ चालक भिलारे, अमोल काटे, शिवाजी भोसले, सुनील पाटील, कैलास भालेराव यांना गुलाब पुष्प व सुरक्षीत सेवा बिल्ले देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच उरण आगारात कार्यरत असलेल्या महिला यांत्रिक कर्मचारी कादंबरी म्हात्रे यांना “भुमिकन्या“ पुरस्कार घोषित झाल्याने त्यांनाही प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. उरण आगारात “दिवाळी जादा हंगामात उत्कृष्ठ“ उत्पन्न आणणारे वाहक आर. एस. तिवारी, व्हि. आ. भाबड व एस. पी. पालवे यांनाही सन्मानित करण्यात आले.
सदर कार्यकमाचे सूत्रसंचालन आगारातील विलास जाबरे व सुभाष पालवे यांनी केले. यावेळी मान्यवरांनी उरण आगाराच्या कार्यप्रणाली बाबत कौतुक केले. अपघात विरहीत सेवा दिल्याबद्दल व इंधन बचतीत पारितोषीक मिळण्याबद्दल अभिनंदन करुन यशोप्राप्तीकरीता आगार व्यवस्थपनास शुभेच्छा दिल्या. उरण आगाराचे पालक अधिकारी राजेंद्र भामरे यांनीही कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यकमाचे नियोजन धिरज पाटील, अमोल पाटील, दिपक म्हात्रे व महेंद्र भगत यांनी केले. आगार व्यवस्थापक सतीश मालचे व वाहतुक निरीक्षक अमोल दराडे यांनी मान्यवर प्रमुख पाहुण्यांचे व आगारातील कर्मचाऱ्यांचे आभार मानले.