स्वच्छतागृहांना गळती

। उरण । वार्ताहर ।
उरण शहरातील स्वच्छतागृहांना पावसाळ्यात गळती लागल्याने नागरीकांना, महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. नगर पालिकेने स्वच्छतागृहाच्या छतावर पत्रे बसविण्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. शहरातील बाजारपेठेत नागरिकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असते.

अशा रहिवाशांना सुसज्ज स्वच्छतागृह असावे, यासाठी नगरपालिकेने राजपाल नाका व गणपती चौक या बाजारपेठेतील महत्वाच्या जागेवर पुरुष व महिला वर्गासाठी काही वर्षांपूर्वी स्वच्छतागृहांची उभारणी केली होती. परंतु नगर पालिकेच्या दुर्लक्षामुळे स्वच्छतागृहांना पावसाळ्यात गळती लागली आहे. त्यामुळे स्वच्छतागृहात ये- जा करणार्‍या नागरिकांना स्वच्छतागृहातील छतातून पडणार्‍या पावसाचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नगर पालिकेने स्वच्छतागृहाच्या छतावर पत्रे बसविण्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे

Exit mobile version