कोल्हापुरात ऑनलाईन प्रचारसभा
| कोल्हापूर | वृत्तसंस्था |
शिवसेनेने भाजपला सोडलंय पण हिंदुत्व सोडलेले नाही,अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी रविवारी भाजपवर जोरदार प्रहार केला. कोल्हापूरशहर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारामुळे कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापलं असून महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांना आक्रमक प्रत्युत्तर देत भाजपचा चांगलाच समाचार घेतला.
विश्वजित नानांच्या प्रचारासाठी फडणवीस आले होते. आता हे दोन शब्द एकत्र जुळले तर त्याचा परिणाम-दुष्परिणाम काय होतो, हे मी सांगण्याची गरज नाही. विरोधकांवर खोटेनाटे आरोप करून आपलं घोडं पुढे सरकतंय का हे बघायचं, अशी भाजपची सवय झाली आहे. आम्ही कामात कमी पडत नाही, आपत्ती आली तर मदतीला धावून जाण्यात कमी पडत नाही, आम्ही फक्त खोटं बोलण्यात कमी पडतो. मात्र कमी पडलो तरी चालेल, पण खोटं बोलणार नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी भाजपला लगावला आहे.
भाजप नेते जर कुस्ती खेळण्यासाठी मैदानात उतरले तर ते आधी पैलवानांच्या घरी धाडी टाकतील, कारण समोरून वार करण्याची हिंमत त्यांच्यात नाही. उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री