। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
तालुक्यातील वरवडे (वरचे) पालवाडी येथे रात्री एका बिबट्याने गाय फस्त केली आहे. बिबट्याच्या या जीवघेण्या हल्ल्याने वरवडे परिसरात दिवाळी सणाच्या कालावधीत भयंकर घबराटीचे वातावरण पसरले आहे, वनविभागाने या बिबट्याला त्वरित जेरबंद करावे, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या परिसरात अजूनही दोन बिबट्यांचा मुक्तसंचार अजूनही त्या परिसरामध्ये सुरू आहे. बिबट्यांचे रात्री मोठ्याने ओरडण्याच्या प्रकार वाढले आहेत. शेतकरी हवालदिल झाले आहेत.