आंबिवलीत बिबट्याचा वावर

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील वन विभागाच्या आंबिवली वनपाल क्षेत्रामध्ये असलेल्या हिऱ्याचीवाडी या आदिवासी वाडीमधील शेतकऱ्यांचे वासरू बिबट्याने खाल्ले आहे. या वर्षात नेरळजवळील जुम्मापट्टी, बेकरे आणि धसवाडी भागातील जनावरांवर बिबट्याने हल्ले केले आहेत.

तालुक्यातील आंबिवलीजवळील हिऱ्याचीवाडी येथील आदिवासी शेतकरी बाळू ठोंबरे यांच्याकडील लहान वासरू हे त्यांच्या अन्य जनावरांसह जंगलात चरायला गेले होते. सोमवारी (दि.5) नेहमीप्रमाणे ती जनावरे चरून आली, मात्र त्यातील एक वासरू घरी परत न आल्याने शेतकरी बाळू ठोंबरे यांनी जंगलाकडे धाव घेतली. मात्र, अंधार पडल्याने वाडीमधील शेतकऱ्यांच्या हाती काही लागले नाही. मंगळवारी सकाळी पुन्हा वाडीतील ग्रामस्थ त्या वासराचा शोध घेतला असता जंगलात ते वासरू रक्तायाच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळून आले. त्या वासराचा जबडा हिंस्त्र प्राण्याने ओढून त्या वासराचे रक्त पिऊन पसार झाला होता. त्यांनतर शेतकऱ्यांनी वन विभागाचे वनपाल विठ्ठल खांडेकर यांना ही माहिती दिली असता वन विभागाचे कर्मचारी तेथे पोहोचले. वन विभागाने त्या मृत वासराचा पंचनामा केला असता त्या वासराचा मृत्यू हा हिंस्त्र प्राण्याने हल्ला कल्याने झाला असल्याचा अहवाल तयार करून वरिष्ठ कार्यालयाला पाठवला आहे.

Exit mobile version