• Login
Saturday, January 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

संमेलनाचा सांगावा

Varsha Mehata by Varsha Mehata
April 30, 2022
in संपादकीय, संपादकीय लेख
0 0
0
संमेलनाचा सांगावा
0
SHARES
39
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

डॉ. शमसुद्दीन तांबोळी

अलिकडेच 95 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलं. उद्गीरमधल्या या साहित्य संमेलनाला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिकुलतेला तोंड द्यावं लागलं. प्रचंड उन्हाळा, तयारीला कमी वेळ मिळणं, प्रचंड खर्च अशा अडचणींशी कसरत करत का असेना, कमी वादांमध्ये हे संमेलन यशस्वी करुन दाखवल्याचं श्रेय आयोजकांना द्यावं लागेल. या संमेलनानिमित्त चर्चेत आलेल्या काही मुद्द्यांचा हा लेखाजोखा.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हा समस्त देशवासियांसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या टप्प्यावर पार पडलेलं 95 वं  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा देखील एक महत्त्वाचा महोत्सव होता असं म्हणावं लागेल. संविधानाला अपेक्षित असणार्‍या समाजाविषयी चिंतन आणि आत्मपरिक्षण होणं आणि सिंहावलोकन करुन त्या बाबतीतले विचार पुढे आणणं हे या संमेलनाकडून अपेक्षित होतं. त्यानुसार या संमेलनात या विषयांवर चर्चा झाली. प्रसारमाध्यमांमध्ये ‘हनुमान चालीसा’च्या वाचनावरुन भोंगे वाजत असल्यामुळे इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी उद्गीरमध्ये पार पडलेल्या साहित्य संमेलनाची फारशी दखल घेतल्याचं जाणवलं नसलं तरी प्रिंट मीडियानं नीट दखल घेतल्याचं पहायला मिळालं हे ही नसे थोडके…!
साहित्य हा समाजाचा आरसा असतो. समाजात बर्‍या-वाईट घटनांपैकी महत्त्वाच्या गोष्टींचं प्रतिबिंब साहित्य संमेलनांमध्ये दिसणं अपेक्षित असतं. 95 वर्षांची दीर्घ परंपरा असल्यामुळे साहित्य संमेलनाच्या मंचाला एक प्रतिष्ठा आहे आणि तिथे होणार्‍या चर्चेला एक आवाज आणि महत्त्व आहे. या सगळ्या दृष्टीनं पार पडलेल्या अलिकडच्या संमेलनाकडे बघणं गरजेचं आहे. साहित्य हे माहिती, मनोरंजन आणि समाज प्रबोधनाचं एक महत्त्वाचं साधन आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे साहित्यिक, वाचक आणि समाजामध्ये संवाद घडवून आणणारं एक माध्यम आहे. या दृष्टीने पार पडलेल्या या संमेलनाकडे पाहिलं तर काही मुद्दे लक्षात येतात. अर्थातच त्यातला पहिला मुद्दा अध्यक्षांच्या भाषणाचा आहे. अनेक उर्दू कथांचा मराठीत अनुवाद करणारे, आपल्या लिखाणाने वेगळी ओळख मिळवणारे प्रसिद्ध लेखक भारत सासणे यांच्या भाषणाचं संमेलनात कौतुक झालं. त्याची नोंद सगळ्यांनीच घेतली. त्यांचं भाषण चुकणार्‍यांचे कान पकडणारं होतं. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केंद्रीय राजकारणात कार्यरत असणार्‍यांना, अगदी केंद्र सरकारलाही खडे बोल सुनावले. मध्यंतरीच्या ‘राजा तू चुकतो आहेस’ या गाजलेल्या अध्यक्षीय भाषणाप्रमाणेच धाडस दाखवणरं हे भाषण होतं. सध्या समाजाचे मूलभूत प्रश्‍न बाजूला ठेवून जनतेची दिशाभूल करणारे मुद्दे समोर आणले जातात, भारतीय संविधानाला अपेक्षित नसणार्‍या गोष्टी राजरोस खपवून घेतल्या जातात, समाजात तेढ पसरवणारे मुद्दे चघळले जातात. या सर्व विषयांवरील अभ्यासपूर्ण विवेचन सासणेसरांनी आपल्या भाषणामध्ये केलं. त्याचबरोबर धर्मवादी राजकारण करणार्‍यांना आणि संविधानात्मक राष्ट्रवादापेक्षा सांस्कृतिक राष्ट्रवाद आणण्याची योजना राबवणार्‍यांनाही त्यांनी चुकीच्या वर्तनाची जाणीव करुन दिली. भारतीय संविधानाला अपेक्षित असणारा समाज निर्माण करण्यामध्ये शासनाची भूमिका सकारात्मक आहे की नकारात्मक, या मुद्द्यांवर त्यांनी नेमकं बोट ठेवलं.
सासणेसरांचं हे अध्यक्षीय भाषण म्हणजे त्यांच्या निर्भिडपणाचा दाखलाच होता. कोणाचाही मुलाहिजा न बाळगता, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरेपूर वापर करुन घेत मांडणी करणं हे या भाषणाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. अशा पद्धतीने इतर कोणाला असं ऐकवणं शक्य झालं नसतं. कोणी हे मुद्दे स्पष्टपणे ऐकवण्याचा प्रयत्न केला असता तर तो निश्‍चितच वादाचा विषय ठरला असता. पण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाला एक प्रतिष्ठा असते आणि त्यांचं म्हणणं ऐकून त्यावर विचार केला पाहिजे, त्याविषयी गांभीर्य दाखवलं पाहिजे ही आपली परंपरा आहे. इथे ही परंपरा पाळली गेली याचं समाधान आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्तानं जाणवलेला आणखी एक बदल हा अध्यक्षपदासाठीच्या निवडीमध्येही जाणवत आहे. या पदासाठीची निवड आणि संमेलनानंतर त्या संदर्भात वाद आणि प्रतिवाद चर्चेत राहण्याची परंपरा आपण बराच काळ अनुभवली. पण गेल्या काही वर्षांपासून अध्यक्षाची निवड प्रक्रिया निकोप झाल्याचं जाणवतं. त्यातल्या स्पर्धेच्या, असुयेच्या राजकारणाला आता बगल दिली जात असून सर्वानुमते संमेलनाचा अध्यक्ष निवडणं ही प्रक्रिया कोणत्याही प्रकारची तेढ निर्माण न करणारी आहे. म्हणूनच ही बाब स्वागतार्ह वाटते.
यापूर्वीचं म्हणजेच नाशिकमध्ये पार पडलेलं साहित्य संमेलन डॉ. जयंत नारळीकर यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि विज्ञानवादी अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलं होतं. हे नाव साहित्य संमेलनाची उंची वाढवणारं होतं. परंतु कोरोनामुळे, नारळीकर सरांच्या आजारपणामुळे आणि वृद्धापकाळामुळे त्यांना संमेलनासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहता आलं नव्हतं. पण हा देखील एक चर्चेचा, वादाचा मुद्दा ठरला होता. त्या संमेलनानंतर अवघ्या तीन-चार महिन्यात उद्गीरचं हे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं. म्हणजेच या आयोजकांना तयारीसाठी अत्यंत कमी वेळ मिळाला. तरीदेखील आयोजकांचा उत्साह वाखणण्याजोगा होता. उदयगिरी कॉलेजच्या 36 एकरच्या परिसरात हे साहित्य संमेलन दिमाखात पार पाडल्याबद्दल आयोजकांचं अभिनंदन केलं पाहिजे.
उद्गीरमधल्या साहित्य संमेलनाला वेगवेगळ्या प्रकारची प्रतिकूलता होती. प्रचंड उन्हाळा, तयारीला कमी वेळ मिळणं, सर्व स्तरावरील लोकांचा सहभाग अशा सगळ्या अडचणींशी कसरत करत का असेना, कमी वादांमध्ये हे संमेलन यशस्वी करुन दाखवल्याचं श्रेय त्यांना द्यावं लागेल. दुसरी बाब म्हणजे नेहमीप्रमाणे या व्यासपीठावर राजकीय व्यक्तींची उपस्थिती होती. अर्थात राजकारण आणि राजकीय मुद्दे बाजूला ठेवून साहित्याला आणि साहित्यिकांना अग्रक्रम देत त्यांनी मांडलेले विचार नेहमीच स्वागतार्ह ठरतात. या पार्श्‍वभूमीवर यंदाच्या संमेलनात शरद पवार यांच्यापासून नितीन गडकरी यांच्यापर्यंत राजकारण्यांची उपस्थिती दिसली. पण या दोघांनी परस्परांविषयी कोणतंही राजकीय भाष्य न करता, समंजस पद्धतीनं अनुक्रमे उद्घाटन आणि समारोपाचा कार्यक्रम पार पाडला. त्यांनी वाद आणि प्रतिवादासाठी या व्यासपीठाचा वापर न करणं ही देखील एक जमेची बाब म्हणायला हवी.
या संमेलनाच्या निमित्तानं जाणवलेली आणखी एक बाब म्हणजे एवढी मोठी आणि जय्यत तयारी करुनही लोकसहभाग आणि साहित्यप्रेमींचा अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याचा उमटलेला सूर. अर्थातच आधी उल्लेख केल्याप्रमाणे यामागे काही कारणं असू शकतात. खरं तर मराठवाड्याची ही भूमी संतांची, साहित्यिकांची म्हणून ओळखली जाते. तिथे विचारांची एक वेगळी परंपरा आहे.
म्हणूनच संमेलनाला गर्दी जमवण्यात अपयश येण्यामागे संयोजक, साहित्यिकांपेक्षाही काही बाह्य घटक कारणीभूत असल्याची शक्यता वाटते. काही परिस्थितीजन्य घटकांमुळेही इथे गर्दी कमी झाली असं आपण म्हणू शकतो. उदाहरणार्थ उद्गीर ही तालुक्याची जागा आहे. तिथे उपस्थितांच्या निवासाची सोय करणं त्रासदायक ठरलं. त्यामुळेच अनेकांची राहण्याची व्यवस्था लातूरला, काहींची गुलबर्ग्याच्या अलिकडील गावात तर काहींची अन्य ठिकाणी करावी लागली. कॉलेजच्या हॉस्टेलचा काही भाग उपस्थितांच्या निवासासाठी वापरला गेला. गर्दी न होण्यामागे अशा काही घटकांचा भाग महत्त्वपूर्ण राहिला. खेरीज या संमेलनामध्ये पार पडलेल्या मनोरंजनाच्या कार्यक्रमांचीही बरीच चर्चा कानावर पडली. मनोरंजनाचे हे कार्यक्रम व्यावसायिक होते. पण त्याला बरंच महत्त्व दिलं गेलं. उदाहरणार्थ, ‘चला हवा येऊ द्या’सारखा कार्यक्रम अथवा अजय-अतुल यांचा कार्यक्रम वा अवधुत गुप्ते यांचा कार्यक्रम चर्चेचं कारण ठरला. गर्दी खेचण्यासाठी अथवा या व्यावसायिक कलाकारांना आपल्या भागात आणण्यासाठी आणि लोकांना ते प्रत्यक्ष बघायला मिळावं यासाठी संयोजकांनी हे पाऊल उचललं असलं तरीदेखील या कार्यक्रमांवर इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च करणं किती संयुक्तिक होतं, यावरही बरीच चर्चा ऐकायला मिळाली. साहित्य संमेलनामध्ये टीव्हीवर सातत्यानं दाखवले जाणारे कार्यक्रम घेण्याचं प्रयोजन आहे का, यावर खरोखर विचार होणं गरजेचं आहे. ‘म्हातारी मेल्याचं दु:ख नसतं पण काळ सोकावतो’असं म्हणतात. एकदा तुम्ही काहीजणांना अशी संधी दिली तर उद्या आणखी अनेकजण या संधीची मागणी करतील आणि साहित्य संमेलन हे मनोरंजनाचं केंद्र बनण्यास वेळ लागणार नाही. हा प्रघात पडण्याचा मोठा धोका आणि त्या निमित्तानं येऊ शकणार्‍या अडचणी आपण वेळीच ओळखायला हव्यात. यातून चुकीचे पायंडे पडण्याचाही मोठा धोका आहे. म्हणूनच याविषयी चर्चा होणं संयुक्तिक म्हणावं लागेल.

Related

Tags: alibageditorial articlemarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

जय महाराष्ट्र!

Next Post

पेणमध्ये वाईनच्या दुकानात चोरी

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी – भाग 1
पोलादपूर

दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी – भाग 1

July 25, 2025
Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले
sliderhome

Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले

April 2, 2025
वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील
sliderhome

वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील

March 18, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका
रायगड

अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका

March 8, 2025
Next Post
नारंगी येथील भुवनेश्वर मंदिरात शिवलिंगाचा चांदीचा मुखवटा चोरीला

पेणमध्ये वाईनच्या दुकानात चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?