। मुंबई । वृत्तसंस्था ।
कोरोनाच्या निर्बंधांमुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यात चर्चा सुरू होती. येत्या १ एप्रिल ते ८ एप्रिलपर्यंत राज्य सरकारने संचारबंदी लागू केली होती. या पार्श्वभूमीवर सण कसे साजरे करायचे? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला होता. मात्र, आता त्यासंदर्भात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध काढून महाराष्ट्र निर्बंधमुक्त करण्यात आला आहे. याशिवाय, मास्क घालणेदेखील बंधनकारक नसेल, अशी माहितीही राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. त्यामुळे आता सण साजरे करण्यात कोणतीही अडचण येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पूर्ण मंत्रिमंडळाने उद्यापासून अर्थात १ एप्रिलपासून महाराष्ट्रातील सर्व निर्बंध उठवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांना वाटत असेल त्यांनी मास्क लावावा अन्यथा ज्यांना मास्क नकोस वाटणाऱ्यांनी लावू नये. आता कोणतंही बंधन राज्यात राहिलेले नाही.
जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण मंत्री