महाराष्ट्र कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या दिशेनं?

। मुंबई । वृत्तसंस्था ।
जुलै महिन्याच्या पहिल्या अकरा दिवसांमध्ये महाराष्ट्रात कोरोनाचे 88 हजार 130 रुग्ण आढळून आले. ह्या आकडेवारीमुळे आता तज्ज्ञांकडून कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका व्यक्त कऱण्यात येत आहे. करोनारुग्णांच्या संख्येत झालेली ही वाढ करोनाच्या तिसर्‍या लाटेची सुरुवात असू शकते, असंही तज्ज्ञांचं म्हणणे आहे.

महाराष्ट्रात आलेल्या कोरोनाच्या आधीच्या दोन लाटांप्रमाणेच ह्याही लाटेचं स्वरुप आता दिसून येत आहे.दिल्लीत दुसर्‍या लाटेदरम्यान 25 हजार नवे बाधित आढळून आले होते. मात्र 1 जुलै ते 11 जुलै या कालावधीत केवळ 870 रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 11 दिवसांमध्ये 3000 हून अधिक रुग्णांची नोंद झाली तर गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतली रुग्णसंख्या 600च्याही खाली आली आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन न करणं आणि लसीकरणाचा मंदावलेला वेग यामुळेच हा धोका निर्माण झाला आहे. कंटाळ्या किंवा सक्ता केल्यामुळे लोक घरात राहायलाच तयार नाहीत. तसंच मास्क आणि स्वच्छता तसंच इतर नियमांचं पालन करत नाहीत. त्यामुळे या विषाणूचं फावतं आणि त्याला प्रसार व्हायला संधी मिळते आहे.

दोन्ही लाटा जेव्हा आपल्या सर्वोच्च बिंदूला होत्या त्यादरम्यान सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रातच आढळून आले आहेत. आता महाराष्ट्रात वाढणारी रुग्णसंख्याही अशाच प्रकारची दिसून येत आहे. फोर्टीस हिरानंदानी रुग्णालयाचे डॉ. चंद्रशेखर यांनी सांगितलं की, दुसर्‍या लाटेच्या शेवटी मुंबई आणि महाराष्ट्रातली कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली होती. मात्र जुलैच्या पहिल्या 10 दिवसांमध्ये ही संख्या कमालीची वाढली आहे. या काळात राज्यात 79 हजार 500 नवबाधितांची नोंद झाली आहे. तज्ज्ञांनी सांगितलं की जुलैमध्ये वाढलेली कोरोनाबाधितांची संख्या हा धोक्याचा इशारा आहे. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या वेळी बाधितांचा उच्चांक दिसून आला आहे. मात्र, सर्वसाधारणपणे सध्या हा विषाणू सक्रिय आहे एवढं मात्र नक्की.

Exit mobile version