वादळात घराचे मोठे नुकसान

| सुतारवाडी | वार्ताहर |

रायगडात मागील चार दिवसांपासून अवकाळीने दाणादाण उडवून दिली आहे. शुक्रवारी झालेला अवकाळी पाऊस आणि वादळी वार्‍यांमुळे जावटे येथील पांडुरंग सखाराम शेपोंडे यांच्या घरावरील सर्वच्या सर्व पत्रे घराच्या बाजूला उडून पडले. यात त्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले.

सायंकाळी अचानकपणे वादळी वार्‍यासह कोसळणार्‍या पावसामुळे ग्रामीण भागामध्ये अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. पांडुरंग शेपोंडे यांच्या घराचे पत्रे जमिनीवर कोसळले. नशिबाने कोणी घराबाहेर अंगणात नव्हते, नाहीतर मोठा अनर्थ घडला असता. दरम्यान, या घटनेचा तात्काळ पंचनामा करुन पांडुरंग शेपोंडे यांना आर्थिक नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Exit mobile version