श्रीवर्धन | प्रतिनिधी |
पाश्चात्य संस्कृतीच्या आक्रमणामुळे,चंगळवादी जीवनशैलीमुळे माणूस माणसापासून ख-या अर्थाने दुरावला आहे. त्यातून कौटुंबिक हिंसाचाराच्या अनेक केसेस दिवसेंदिवस वाढत आहेत अशी खंत न्या प्रतीक लंबे यांनी व्यक्त केली.
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या श्रीवर्धन येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि तालुका विधी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागरण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार 2 आॉक्टोबर ते 14 नोव्हेंबर 21 या कालावधीत श्रीवर्धनचे दिवाणी न्यायाधीश न्या. प्रतिक लंबे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली श्रीवर्धन तालुक्यात अनेक ठिकाणी व्याख्यानांच्या माध्यमातून गावागावांत कायदेविषयक जनजागरण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
त्या अंतर्गत गोखले महाविद्यालयात कायदा, जनजागरण व सुव्यवस्था या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व मान्यवरांचे प्राचार्य डॉ. श्रीनिवास जोशी यांनी स्वागत केले. प्रास्ताविक अॅड. विठोबा पाटील यांनी केले. ज्येष्ठ विधीज्ञ अॅड.आशिष वढावकर ज्येष्ठ पत्रकार आनंद जोशी यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाविद्यालयाच्या विकास समितीचे सदस्य शांतीलाल जैन, राजेंद्र भोसले, नितीन सुर्वे.यांनी समाधान व्यक्त केले.