। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
वरवडे येथील विवाहितेने मानसिक संतुलन बिघडल्याने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना मंगळवार 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 1.45 वा. सुमारास घडली. अनिशा अनिल गोरे (33) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. अनिशाचे गेल्या सहा महिन्यांपासून मानसिक संतूलन बिघडलेले असल्यामुळे ती तणावाखाली होती. मंगळवारी ती आणि तिचा 10 वर्षांचा मुलगा घरात असे दोघच घरात असताना अनिशाने राहत्या घराच्या भालाला ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. दूपारी 1.45 वा. सुमारास तिचा पती अनिल दत्ताराम गोरे घरी आला असता त्याला पत्नी अनिशा ही गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. त्याने तात्काळ याबाबत जयगड पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला. याबाबत जयगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.







