अंबादास दानवेंचा मोदी-शाहांवर जोरदार निशाणा
| हिंगोली | वृत्तसंस्था |
महाराष्ट्रात पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना एवढ्या सभा घ्याव्या लागतात, याचाच अर्थ इथे महाविकास आघाडी मजबूत आहे, त्यांच्या डोळ्यासमोर अपयश दिसतंय. राज्याचे नेतृत्व कुचकामी दिसतंय. दोन पक्ष फोडून गद्दार सोबत घेऊन, यश मिळत नाही, अशी त्यांची स्थिती आहे. त्यामुळे त्यांचा प्रचारसुद्धा अतिशय पोचट झालेला आहे. तेच बहनो-भाईयो म्हणत खोटारड्या घोषणा करतात, त्याचा कुठलाही परिणाम महाराष्ट्रात होणार नाही, असं म्हणत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यासह भाजपवर निशाणा साधला आहे.
लोकसभेच्या प्रचारात शिवसेना फार पुढे आहे, विजय जवळपास निश्चित आहे. हिंगोली लोकसभेचा सर्व विधानसभानिहाय आढावा घेतलेला आहे. जास्तीत जास्त मतांनी विजयी व्हावा, यासाठी कार्यकर्त्यांनी काम करायला पाहिजे, असंही दानवे यांनी म्हटलं आहे. ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली, त्यांना गाडून टाकू, या उद्देशाने हिंगोली लोकसभेतील शिवसैनिक कामाला लागले आहेत. यश आमचंच आहे, पण हे यश आणखी देदीप्यमान व्हावं, यासाठी सगळे प्रयत्न करत आहेत, असं अंबादास दानवे यांनी सांगितलं आहे.
बहिणीचे झालेत, तेच भावाचे हाल होतील अंबादास दानवे म्हणाले की, पंतप्रधानांनी जानकर यांना लहान भाऊ संबोधित केला आहे. बहिणीचे (भावना गवळी) काय हाल झालेत, तसेच हाल भावाचे होतील. कोकणात निवडणुका या राणेविरुद्ध ठाकरे होतील. राणेचं काय, राणेंना तर वैभव नाईक यांनी हरवलेलं आहे, आमच्या सावंत यांनी हरवलेला आहे, त्यामुळे ठाकरेंची गरज काय आम्ही शिवसैनिक आहोत ना लढायला तिथले विनायक राऊतच काफी आहेत, त्यांच्यासोबत लढायला, असंही दानवे म्हणाले.
जखमी वाघ त्वेशाने लढतो वाघा हा वाघ असतो, जखमी निश्चित झालेला आहे आणि जखमी झालेला वाघ अतिशय त्वेशाने लढत असतो. ही लढाई उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही लढतोय. करायचं एक आणि सांगायचं एक, असं उद्योगपतीपणाने आम्ही वागत नाही, त्यामुळे आमच्यासोबत मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज बांधव या महाराष्ट्र काय देशात उभे राहिलेत, त्याच पोटसूळ उठतंय, पण मुस्लिम बांधव शिवसेनेसोबतच राहतील, असंही दानवे म्हणाले आहेत.