। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
आपल्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने रायगड जिल्हयातील संतप्त सहाआसनी रिक्षा चालकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांनी गुरुवारी 16 मार्च रोजी कोणत्याही सरकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मिनीडोअर चालक मालकांनी सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मिनीडोअर सेवा बंदचा परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. या सेवेवर अवलंबून असलेल्या प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.
आपण 16 मार्च रोजी जिल्हयातील कोणत्याही शासकीय कार्यालयासमोर आत्मदहन करू. याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकार व संबंधित अधिकार्यांची राहील असा इशारा देण्यात आला आहे. त्यावर परीवहन आयुेांबरोबर चर्चा घडवून आणू असे आश्वाासन बैनाडे यांनी शिष्टमंडळाला दिले. या मागण्यांकडे होतेय दुर्लक्ष जुन्या परमिटवरील तीनचाकी व सहाआसनी वाहने स्क्रॅपमध्ये गेल्यावर चारचाकी, सहाआसनी बदली वाहनास सीएनजी कीट बसवण्यास परवानगी द्यावी, वाहनांची वयोमर्यादेत केवळ 2 वषारची वाढ करावी, कोरोना काळात जाहीर केलेले प्रतिरिक्षा 1500 रूपये सानुग्रह अनुदान मिळावे, करभरणा करताना विलंब झाल्यास चक्रवाढ व्याज न आकारता सुट मिळावी, मागेल त्याला टॅक्सी ऑनलाइन परवाने बंद करावेत, अशा त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.