। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन रनवेवर विमान ओढण्यासाठी वापरल्या जाणार्या गाडीला(पुशबॅख व्हिकल)ला आग लागली होती. ही आग लागली तेव्हा विमानात प्रवासी होते. पण, यात कुठलीही जीनितहानी झाली नाही.
आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी (दि.10) मोठी दुर्घटना टळली. विमानाला पुशबॅक देणार्या वाहनाने अचानक पेट घेतला. ही घटना दुपारी एकच्या सुमारास घडली. ही आग लागली तेव्हा पुशबॅक वाहन गुजरातच्या जामनगरला जाणार्या एअर इंडियाच्या फ्लाइट आय 647 ला ढकलत होते. विमानतळ अधिकार्यांनी सांगितल्यानुसार, अपघातावेळी विमानात सुमारे 85 प्रवासी होते. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये अग्निशमन दलाचे पथक आग विझवताना दिसत आहे. विमानतळ अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार आग आटोक्यात आणण्यात आली असून, या घटनेत विमानाचे कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
मुंबई-जामनगर फ्लाइटमध्ये 85 प्रवासी होते. अचानक पुशबॅक टगला आग लागली. या घटनेनंतर काही वेळातच अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यास सुरुवात केली. 10 मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या घटनेत कोणत्याही व्यक्तीला इजा झालेली नाही. आग आटोक्यात आणल्यानंतर सर्व कामे सुरळीत सुरू झाली.