| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबई-छत्तीसगड यांच्यामधील रणजी क्रिकेट करंडकातील एलिट ‘ब’ गटातील लढत सोमवारी अनिर्णित राहिली. आता मुंबईचा संघ 30 गुणांसह पहिल्या स्थानावर असून छत्तीसगडचा संघ 13 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. मुंबईच्या संघाने सोमवारी 1 बाद 97 या धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली. मुंबईने 6 बाद 253 धावांपर्यंत मजल मारली. पृथ्वी शॉ 45 धावांवर रविवारीच बाद झाला होता. अमोघ भटकळ 24 धावांवर बाद झाला. भूपेन लालवानी याने 59 धावांची खेळी केली.