श्रीवर्धन मार्गाने मुंबईला जाणाऱ्या गाडीला भीषण अपघात; सुदैवाने जिवितहानी टळली

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन कोलमांडला बागमांडला वरून मुंबईला जाणाऱ्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील श्रीवर्धन आगरातील बागमांडले येथून सकाळी १०:१५ वाजता सुटणाऱ्या एम एच १४ बीटी २७३८ गाडीचे ब्रेक फेल झाल्याने साखरोने फाटा येथे भीषण अपघात झाला असून गाडीवर कार्यरत असणाऱ्या चालकाच्या प्रसंगावधाने मोठा अनर्थ टळला आहे. महामंडळाच्या बसमध्ये तब्बल ३० प्रवासी होते. त्यापैकी सात ते आठ प्रवासी जखमी झाले असून उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन येथे त्यांना हलवण्यात आले आहे.

Exit mobile version