| पाताळगंगा | वार्ताहर |
भानुदास भिवा चौधरी हे कलोते फाटा येथे वडापाव चहा विक्रीचा व्यवसाय करीत होते. मात्र, त्याच ठिकाणी नितेश पाटील यांचा व्यवसाय असल्यामुळे त्यांच्यामध्ये व्यावसायिक चुरस निर्माण होत. यामुळे आपल्या व्यवसायाला वडापावचे दुकान अडथळा निर्माण होत असल्यामुळे चौधरी यांचा गळा दाबून हत्या करण्यात आली. तसेच त्यांचा मृतदेह या हॉटेलच्या पाठीमागे महेश भंडारी यांच्या शेतामध्ये असलेल्या उंबराच्या झाडाखाली टाकण्यात आला. मात्र, पोलिसांनी गोपनीय माहिती घेऊन आरोपीस 24 तासांच्या आत अटक केली आहे.
याबाबत हकीकत अशी की, भानुदास भिवा चौधरी हे कलोते फाट्यावर वडापाव चहाचे दुकान होते. नेहमीप्रमाणे दुकान बंद करुन घरी जात असताना त्या दिवशी हॉटेलमध्ये झोपण्याचा निर्णय घेतला. मात्र याची माहिती आरोपीस कळताच त्यांचा सहकारी मारुफ उर्फ मेहबुब हसमत अली, मूळ रा. उत्तरप्रदेश, सध्या कलोते राहात असून, या दोघांनी संगनमत करुन चौधरी यांचा गळा दाबून त्यास जिवे ठार मारले. पोलिसांनी गोपीनीय माहिती घेऊन आरोपीपर्यंत पोहोचून त्यास पोलिसी खाक्या दाखविताच आपण खून केल्याचे कबूल केले.
सदरची कामगिरी सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक रायगड, अतुल झेंडे, अपर पोलीस अधीक्षक रायगड, विक्रम कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मिलिंद खोपडे, पोलीस निरीक्षक, खालापूर पोलीस ठाणे, सपोनि मनिष मोरे, सपोनि सूर्यवंशी, पोउनि/आरोटे, मपोउनि/सरीता मनवर, पोउनि रोहिदास भोर, पोउनि/शिवाजी जुंदरे, सहा. फौजदार सुभाष म्हात्रे, पोलीस हवालदार रतन बागुल, नितीन शेडगे, निलेश कांबळे, अमित सावंत, विशाल शिंदे, हेमंत कोकाटे, शरद फररांदे, रणजीत खराडे, मनोज सिरतार, चंद्रकांत पयेर, आशिष पाटील, महिला पोलीस हवालदार हेमा कराळे, अंकिता चिंबुळकर, प्रतिक्षा म्हात्रे, दिक्षा पवार यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.