। नेरळ । प्रतिनिधी ।
राज्यातील मोठया शहरात महापुरुष आणि थोर महान व्यक्ती यांची नावे असलेल्या पाट्या दिसून येतात, मात्र लहान नगरपालिका असलेल्या कर्जत शहरात महापुरुषांच्या नावांच्या पाट्या झळकल्या आहेत. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत तब्बल 50 लाख खर्चून तब्बल 190 फलक कर्जत शहरात लागले आहेत.दरम्यान, कर्जतसारख्या लहान शहराचे रूप पालटवणारे हे फलक शहराच्या वैभवात भर टाकणारे असल्याचे आता कर्जतकर मान्य करू लागले आहेत. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानमध्ये कर्जत नगर परिषद मोठे नामांकन मिळविण्यासाठी हे बदललेले रूप महत्वाचे असणार आहेत.
नवख्या माणसाला उपयोग व्हावा रस्ताही शहरात बाहेरून आलेल्या व्यक्तीला परिसरात फिरताना निश्चित स्थळी जाण्यासाठी शोधाशोध करावी लागू नये यासाठी पालिकेने केलेल्या कामाचे बक्षीस यापूर्वी मिळाले आहे. त्या बक्षिसाच्या निधीमधून शहराचे रुप बदलण्याचा प्रयत्न सुरु झाला. त्यात नगराध्यक्ष सुवर्णा जोशी आणि पालिका मुख्याधिकारी डॉ पंकज पाटील यांनी आगळावेगळा उपक्रम राबविण्याचा निर्णय झाला आणि कर्जत शहर आज साइन बोर्डच्या माध्यमातून महापुरुषांचे फलक दिसू लागले आहेत. काम अंतिम टप्प्यात असून स्वच्छ भारत मिशनमधून केलेल्या कामाचे शहरवासीय कौतुक करीत आहेत.
आपल्या शहराला भूषण असलेल्या समाजातील यांची नावे वेगळ्या स्थळांना त्यांना आणि पदपथ तसेच उद्याने यांना असावीत असे मला सातत्याने वाटत होते. त्यामुळे नगरसेविका म्हणून पाच वर्षे विचार केला होता. आता पालिकेत सर्वांच्या सहकार्याने शहराला महापुरुष यांच्या कार्याची परंपरा आहे आणि म्हणून ती नावे देताना आनंद होत आहे.
एकूण 190 फलक लावले……
शहरातील उद्यानानादेखील वेगवेगळी नावे देण्यात आली आहेत.त्यात दहिवली भागातील उद्याने यांना सद्गुरुकृपा उद्यान, साईनगर उद्यान, सुवर्णजयंती उद्यान,नाना नानी पार्क, मीनाताई ठाकरे उद्यान अशी नावे देण्यात आली आहेत.तर शहराच्या गावाच्या जडणघडणीत महत्वाचे योगदान देणारे मान्यवर यांची देखील नावे देण्यात आली असून या सर्व साइन बोर्ड पाट्यांमुळे कर्जत शहराला नवीन रूप आले आहे. कर्जत शहरात हे असे 190 बोर्ड लावले जात आहेत, अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे, शहरात प्रवेश केल्यानंतर मुख्य रस्त्याला निरुपणकार तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव दिले जात आहे.
शहराच्या मुख्य रस्त्यांना तालुक्यातील दोन हुतात्मे भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांचे नाव तसेच प्रबोधनकार ठाकरे, स्वातंत्र्य सावरकर, वासुदेव बळवंत फडके, कर्जत शहरातील स्वतंत्रसैनिक बाळासाहेब ठोस यांच्यासह भारतरत्न डॉ. एपी अब्दुल कलाम, शिवसेनाप्रमुर आणि कर्जत शहरात वास्तव केलेले बाळासाहेब ठाकरे, हुतात्मा बाबू गेनू, बसवेश्वर महाराज, जनरल अरुणकुमा वैद्य, सरखेल कान्होजी आंग्रे, गाडगेबाबा यांच्यासह क्रांति यांची नावे झळकू लागली आहेत.
आपल्या कर्जत शहराला स्वच्छ भारत मिशनमध्ये वेगवेगळ्या उपक्रमासाठी सन्मानित केले आहे. ती रक्कम शहराला वैभव ठरू शकतील असे साइन बोर्ड बनविण्यासाठी वापरण्यात यावी अशी संकल्पना पुढे आली. आणि त्यावेळी पालिकेच्या सदस्य मंडळाने शहरातील चौक, रस्ते, पथ, उद्याने यांना देऊन शहर आणखी वेगळी बानू पाहत आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियान आणि माझी वसुंधरा अभियान साठी हे वेगळे काम महत्वाचे ठरेल.
सुवर्णा जोशी, नगराध्यक्षा