पावसाळ्यात वाहून गेलेल्या कालव्यांमुळे भातशेतीत अडथळे

दुरुस्ती करण्याची आवश्यकता, दुबार शेतीसाठी पाणी नाही
। नेरळ । वार्ताहर ।
दरवर्षी राजनाला कालव्याचे पाणी भाताची शेती करण्यासाठी सोडले जाते. यावर्षी 2021 च्या पावसाळ्यात कालव्यांना पडलेल्या खांडी लक्षात घेऊन त्यांची दुरुस्ती वेळेवर झाली नाही आणि त्यामुले दुबार शेतीसाठी पाणी येणार नाही. दरम्यान,35 गावातील 2500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणणार्‍या राजनाला कालव्यांची दुरुस्ती करणे गरजेचे असताना पाटबंधारे विभागाच्या यांत्रिकी विभागाने मशिनरी दिली नाही आणि त्यामुळे यावर्षी जानेवारी महिना संपायला आला तरी कालव्यात पाणी खळाळत नाही.
टाटा कंपनीच्या आंध्र धरणाच्या पाण्यावर राजनाला कालवा बांधण्यात आला आणि त्या पाण्याचा वापर शेतीसाठी होऊ लागला. त्याचवेळी कालव्याचे पाणी बाराही महिने असल्याने मोठ्या प्रमाणात फार्महाऊस या टाटा परिसरात उभे राहिले. कालव्याच्या पाण्यावर हा भाग सुजलाम सुफलाम झालेला असतांना कालव्याची दुरुस्ती करण्याची आवश्यकता निर्माण झाली. दुरुस्तीसाठी 2011 मध्ये कालव्यात पाणी सोडण्यात आले नाही, परिणामी एक वर्षासाठी बंद ठेवण्यात आलेले पाणी दुरुस्तीचे काम वेळेवर झाले नसल्याने सलग तीन वर्षे बंद ठेवले गेले. त्यामुळे 2100 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणणार्‍या राजनाला कालवा परिसरातील शेतकर्‍यांच्या जमिनी नापीक बनल्या होत्या. त्यामुळे मुख्य कालवे ओसंडून वाहत असतांना त्याचे पाणी शेतीसाठी वापरले गेले नाही असे काहीसे विदारक चित्र कर्जत तालुक्यात राजनाला कालवा परिसरात दिसून येत आहे.तसेच चित्र यावर्षी निर्माण झाले आहे.
तालुक्यातील पूर्व भाग हिरवागार करणार्‍या राजनाला कालवा परिसरात 2021 च्या पावसाळ्यात अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणात कालव्यांना खांडी पडल्या होत्या. त्यामुळे राजनाला कालव्याच्या मुख्य कालवा,उजवा कालवा आणि पाली पोटल कालवा पाणी सोडले गेली नाही,परिणामी अद्याप पर्यंत एकूण क्षेत्र पैकी कोणत्याही भागात राजनाला कालव्याचे पाणी सोडले गेले नाही.2021च्या पावसाळ्यात तब्बल 125 ठिकाणी मोठ्या खांडी पडल्या आहेत. त्या 15 ठिकाणी कालव्यांच्या मातीचा भराव वाहून गेलं आहे. त्यामुळ ती सर्व कामे करून घेण्याची मागणी स्थानिक शेतकरी ऑक्टोबर 2021 पासून करीत होते.मात्र पाटबंधारे खात्याची उदासीनता यामुळे अद्याप पर्यंत कामी पूर्ण होऊ शकली नाहीत. त्यामुळे डिसेंबर महिन्यात दुसर्‍या आठवड्यात कालव्यात सोडले जाणारे पाणी अद्याप सोडले गेले नाही. त्याचा परिणाम भाताच्या शेतीचा हंगाम निघून गेला आहे.मात्र या भागात राजनाला कालव्याला पाणी आलेच नाहीतर मात्र या भागातील जनावरे,विहिरी,बोअरवेल यानं देखील पाण्याचा तुटवडा जाणवणार आहे.आणि सदैव हिरवागार असलेल्या राजनाला कालव्याचा 35 गावांचा परिसर पाणीटंचाई सदृश होणार आहे.
वाहून गेलेल्या कालव्याच्या खांडी लवकर भराव्यात आणि राजनाला कालव्याची पुन्हा बांधणी व्हावी यासाठी काढलेल्या निविदा यांना उशीर झाल्याने शेतकरी वर्गाला डिसेंबर महिन्यात भाताची शेतीसाठी पाणी मिळाले नाही.त्यात कालव्यांची दुरुस्ती करण्यासाठी शासनाकडून पाटबंधारे विभागाचा यांत्रिकी विभाग निविदा काढून कामे करून घेत असतो.मात्र यावर्षी पाटबंधारे खात्याच्या पुणे येथील यांत्रिकी विभागाने कर्जत तालुक्यातील राजनाला कालव्याच्या कामासाठी अवजड मशीन उपलब्ध करून दिले नाही.त्यामुळे कर्जत तालुक्यातील राजनाला कालव्याची दुरुस्ती नोव्हेबर महिन्यात झाली आणि परिणामी कालव्यांना पडलेली भगदाडे बंद करता आली नाहीत आणि त्यामुळे कालव्यात पाणी सोडता आले नाही.डिसेंबर महिन्यात पाणी सोडले तर भाताची शेती करता येते,मात्र जानेवारी महिना संपण्याची वेळ आली तरी राजनाला कालव्याच्या मुख्य नाला,तसेच उजवा आणि डावा कालव्यात पाणी सोडले गेले नाही आणि त्यामुळे कुठेही जमीन ओलिताखाली आली नाही.या भागातील शेतीकारी पावसाळ्यात झालेल्या भातपिकाच्या नुकसानीमुळे उन्हाळी हंगामातील भाताची शेती करण्यासाठी दुबार पीक घेता यावे यासाठी पाण्याची वाट पाहत होते.
सध्या पाटबंधारे विभागाकडून एक जेसीबी मशीन आणि लहान प्रोक्लेम मशीन यांच्या साह्याने राजनाला कालव्याला पावसाळ्यात पडलेली भगदाडे बंद करण्याचे काम करीत आहे. मात्र कालव्याचे मोठे भाग वाहून गेल्याने दुरुस्ती करणे सहज शक्य होणार नाही हे लक्षात घेऊन पाणी सोडण्यात येणार नाही अशी नोटीस पाटबंधारे विभागाने बजावली आहे. मात्र शेतकरी पाटबंधारे विभागाला कालव्यांना पडलेल्या खांडी पाटबंधारे विभागाने तात्काळ भरण्याची कार्यवाही का केली नाही? असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.

चौकट
35 गावांचा तारणहार…
टाटा च्या आंध्र धरणातून वीज निर्माण केल्यानंतर खाली सोडले जाणारे पाणी हे पेज नदी मधून वाहत जाते.तेच पाणी पुढे उल्हासनदी द्वारे कल्याणच्या खाडीला जाऊन मिळते.वीज निर्मिती झाल्यानंतर चे पाणी नदी मध्ये जात असताना त्या ठिकाणी राजनाला कालवा बांधून शेतीसाठी वळविले गेले आहे.ते पाणी ज्या ठिकाणी मुख्य कालव्यातून उजवा,डावा आणि पोटल कालव्यात सोडले जाते.तेथे कालव्यात घातलेला बांध जेसीबी मधून च्या साहाय्याने खोदून पाणी राजनाला कालव्यात सोडण्यात येत असते. कालव्यांना सर्वत्र पाणी दिसत असून शेत देखील ओली होऊन त्या भागात पुन्हा एकदा हिरवळ उगविण्यास सुरुवात झाली आहे.

Exit mobile version