खरीवली गावातील सांडपाणी रस्त्यावर

स्थानिक संतापले
। खोपोली । प्रतिनिधी ।
खरीवली गावातील सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्यामुळे गावात दुर्गंधी पसरली असून या गंभीर समस्येकडे स्थानिक लोकप्रतिधी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ संतापले. खालापूर तालुक्यातील खरीवली ग्रामपंचायत एक आदर्श ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतीचे कार्यालय असलेल्या खरीवरी गावात 145 ते 150 घरे आहे. गाव स्वच्छ आणि समृद्ध असले तर सांडपाणी वाहून नेण्यासाठी गटारांची व्यवस्था नसल्यामुळे सांडपाणी वाहत मुख्य रस्त्यावरील मंदिराच्या परिसरात पसरला आहे. यामुळे गावात दुर्गंधी पसरली असून या गंभीर समस्येकडे स्थानिक लोकप्रतिधी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष करीत असल्याचे ग्रामस्थ विष्णू पाटील, अशोक पाटील, मिलींद दाभोलकर, पुंडलिक पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे.

Exit mobile version