खा.सुनिल तटकरे यांचा विश्वास
। पाली । वार्ताहर ।
पाली नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीत जनमताचा कौल हा शेकाप-राष्ट्रवादी आघाडीलाच मिळले, असा विश्वास खा. सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या चर्चेत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकारमध्ये शिवसेना मित्रपक्षाच्या भूमिकेत असला तरी रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी व शेकाप अशी लढत होत आहे, यावर सुनिल तटकरे यांनी भाष्य केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तेथील स्थानिक राजकारण पाहून त्या ठिकाणी हा निर्णय घेतला असल्याचे स्पष्टीकरण खा. तटकरे यांनी पालीत प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. यावेळी ओबीसी आरक्षण व बैलगाडा शर्यत या विषयावर देखील भूमिका मांडली.
पाली-सुधागडात शेतकरी कामगार पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली आहेत व होत आहेत. याच आधारावर पाली नगरपंचायत निवडणुकीत शेकाप राष्ट्रवादी आघाडीला जनता कौल देणार असा विश्वास खा. सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला आहे.