। कुसुंबळे । वार्ताहर ।
प्रत्येक व्यक्तीने झाडांचे महत्त्व समजून जास्तीत जास्त झाडे लावून ती जगविली पाहिजेत, हाच उद्देश समोर ठेवून माणुसकी प्रतिष्ठान जितनगर-अलिबागतर्फे वृक्षारोपण करण्यात आले. माणुसकी वाचनालयाला जागा उपलब्ध करून देणारे कै. हरिश्चंद्र म्हात्रे आणि म्हात्रे यांच्या स्मरणार्थ पेण येथील आशिष कडू यांनी रोपे उपलब्ध करून दिल्याने फेज 3 मधील जवळ जवळ 200 रोपे लागवड करून वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यात आला.
यावेळी रोटरी क्लब सी शोर अलिबाग सचिव निमिष परब, आरसीएफचे अजय घरत, माणुसकी टीमचे संजय काळेल, ऋषिकेश वाडकर, विनायक म्हात्रे, इरफान जमेदार, सतीश कणसे, संतोष कणसे, तानाजी आगलावे, विशाल आढाव, सिद्धांत कोळी, विपुल जगदाळे, रेखा पाटील, सागर वाघे, निता वाघे, कृष्णा वाघमारे, अमृत म्हात्रे, आनंद पांडव, शिवतेज कणसे, मधुकर जाधव तसेच डॉ. राजाराम हुलवान इ. उपस्थित होते. यावेळी आशिष कडू व ग्रामपंचायत थळ यांचे विशेष आभार मानण्यात आले.
माणुसकी प्रतिष्ठानकडून नेहमीच समाजोपयोगी कार्य घडत असते. वृक्षारोपण, आपत्ती काळात मदतीस तत्पर, स्वच्छता मोहीम, रक्तदान शिबीर, अन्नधान्य वाटप, जनजागृतीपर कार्यक्रम, मोफत आरोग्य तपासणी, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, आपत्तीग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप असे एक ना अनेक कार्यक्रम आजपर्यंत राबविले आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.