रघुजीराजे आंग्रे यांची प्रमुख उपस्थिती
| अलिबाग | प्रतिनिधी |
कुरुळ येथील आझाद मैदानात पीएनपी चषक क्रिकेट स्पर्धा गेल्या तीन दिवसांपासून सुरु आहे. दुसऱ्या दिवशी डे-नाईट झालेल्या स्पर्धेत वेगवेगळ्या संघांनी आपली कामगिरी बजावत यश संपादन केले. तिसऱ्या दिवशी दुपारी सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी यू.व्ही. स्पोर्ट्स अकादमीच्या संचालिका चित्रलेखा पाटील, भैरवी आंग्रे, विक्रांत वार्डे, रुपेश पाटील, अमोल नाईक आदी मान्यवरांसह खेळाडू, तसेच संघ मालक उपस्थित होते. सुरेश काका इलेव्हन वरसोली आणि अदिरा वॉरिअर्स कावाडे या संघात झालेल्या सामन्यात कावाडे संघाने पाच षटकांत 51 धावा केल्या. वरसोली संंघासमोर विजयासाठी 52 धावांचे लक्ष्य होते. या संघातील खेळाडूंनी 3.5 षटकांत 52 धावा करून विजय मिळविला. सुरेश संघाचा शिरू विक याला सामनावीरचा किताब देण्यात आला.
रुद्र वॉरिअर्स आक्षी नागाव व मुस्कान इलेव्हन या संघात झालेल्या सामन्यात मुस्कान इलेव्हनने फलंदाजी स्वीकारत पाच षटकांत 72 धावा केल्या. आक्षी संघासमोर विजयासाठी 73 धावांचे लक्ष्य होते. परंतु, आक्षी संघाने 4.2 षटकांत 76 धावा करून विजय मिळविला. या सामन्यात अक्षय पाटील सामनावीर ठरला. प्रसाद इलेव्हन अलिबाग आणि रोहांशू इलेव्हन केतकीचामळा या संघांमध्ये झालेल्या सामन्यात केतकीचामळा संघाने फलंदाजी स्वीकारली. त्यांनी पाच षटकांत सात बाद 48 धावा करून 49 धावांचे लक्ष्य अलिबाग संघासमोर ठेवले. प्रसाद इलेव्हन संघाने पाच षटकांत 45 धावा केल्या. त्यामुळे रोहांशु संघाने विजय मिळविला. यामध्ये निशांत पाटील याला सामनावीर म्हणून गैौरविण्यात आले.
7700 जिजाऊ चेंढरे आणि सिया वॉरिअर्स नागाव संघात लढत झाली. चेंढरे संघाने पाच षटकांत 77 धावा केल्या. नागाव संघासमोर विजयासाठी 78 धावांचे लक्ष्य होते. परंतु, ते लक्ष्य पूर्ण करण्यास नागाव संघ अपयशी ठरला. पाच षटकांत फक्त 53 धावामध्ये त्यांना समाधान मानावे लागले. या सामन्यात यश जंगली सामनावीर ठरला. सुरेश काका 11 वरसोली आणि रुद्र वॉरिअर्स आक्षी त्यात झालेल्या सामन्यात वरसोली संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले. आक्षी संघाने प्रथम फलंदाजी करीत पाच षटकांत पाच बाद 52 धावा केल्या. वरसोलीला विजयासाठी 53 धावांचे लक्ष्य होते. मात्र, या संघाने 4.3 षटकांत 56 धावा करीत विजय हाती घेतला. यामध्ये किशोर नाईकला सामनावीरचा किताब देण्यात आला. मुस्कान 11 मांडला आणि आदिरा वॉरिअर्स कावाडे यांच्यात झालेल्या सामन्यात कावाडे संघाने फलंदाजी स्वीकारत तीन बाद 51 धावा केल्या. मांडला संघाने 3.2 षटकांत 54 धावा करीत हा सामना जिंकला. हुसेन टाकी याला सामनावीरचा चषक देण्यात आला.
रोहांशू 11 केतकीचामळा विरूध्द 7700 जिजाऊ 11 चेंढरे संघाच्या लढतीत चेंढरे संघाने सात बाद 59 धावा केल्या होत्या. विजयासाठी केतकीचामळा संघासमोर 60 धावांची लक्ष्य होते. मात्र, या संघाने 3.5 षटकांत 61 धावा करीत हा सामना जिंकला. या सामन्यात सामनावीर विघ्नेश कठोर ठरला.
सिया वॉरिअर्स नागाव आणि प्रसाद इलेव्हन अलिबाग या संघांमध्ये सामना झाला. या सामन्यात सुरुवातीला अलिबाग संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. नागाव संघाने पाच षटकांत सात बाद 40 धावा केल्या. अलिबाग संघाने 2.3 षटकांत 42 धावा करीत सहज विजय मिळविला. या स्पर्धेत पवन कोंडाजी हा सामनावीर ठरला. रुद्र वॉरिअर्स आक्षी आणि मुस्कान 11 मांडला यांच्यात झालेल्या सामन्यात मांडला संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आक्षी संघाने फलंदाजीला सुरुवात केली. पाच षटकांत सहा बाद 40 धावा केल्या. मांडला संघासमोर जिंकण्यासाठी 41 धावांचे लक्ष्य होते. 4.3 षटकांत या संघाने 43 धावा करीत विजय मिळविला. हुसेन डाकी या खेळाडूला सामनावीरचा किताब देण्यात आला.
7700 जिजाऊ 11 चेंढरे आणि प्रसाद इलेव्हन अलिबाग संघामध्ये झालेल्या सामन्यात प्रसाद इलेव्हन संघाने सुरुवातीला क्षेत्ररक्षण स्वीकारले. जिजाऊ संघाने फलंदाजी करीत सहा बाद 50 धावा केल्या. प्रसाद इलेव्हन संघाने 3.5 षटकांत 56 धावा करीत विजय प्राप्त केला. या सामन्यात सामनावीर म्हणून प्रतिक घाडी याला गौरविण्यात आले. तिसऱ्या दिवशी सोमवारी (दि.19) फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता पुन्हा खेळाला सुरुवात झाली. प्रांशी इलेव्हन रोहा आणि ए.बी. ग्रुप अलिबाग या संघामध्ये पहिला सामना झाला. प्रांशी संघाने फलंदाजी करीत पाच षटकांत 57 धावा केल्या. ए.बी. ग्रुप अलिबाग संघाने 3.5 षटकांत 60 धावा करीत हा सामना जिंकला. या सामन्यात सामनावीराचा किताब प्रज्ज्वल ठाकूर याला मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.