ग्रामीण भागात विकासकामांना प्राधान्य

। अलिबाग । वार्ताहर ।
खारेपाट विभागात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वाधिक विकासकामे करण्याचा आमचा प्रयत्न असून एखादया गावात कोणाची सत्ता आहे. याचा विचार न करता विकास कामे करण्याचा काँग्रेस पक्षाचा मानस आहे असे प्रतिपादन राजा ठाकूर यांनी हाशिवरे येथे केले. समिर ठाकूर यांनी पाठपुरावा करून मंजूर केलेल्या हाशिवरे नाका येथील नाल्याला संरक्षक भिंत बांधणे या कामाचे भूमिपूजन ठाकूर यांच्या हस्ते करण्यांत आले त्यावेळी ते बोलत होते. पावसाळा काही दिवसांवर आले असताना फक्त भूमिपूजन नाही तर हे काम वेगाने सुरू केले असल्याबद्दल सरोज डाकी व शैलेश मोकल यांचे कौतूक केले.या कार्यक्रमाला सुनिल थळे, विद्याधर ठाकूर, उमेश गावंड , शैलेश मोकल, हर्षल मोकल, बाळू मोकल, सौरभ मोकल, भालचंद्र अंबाडे, जालींद्रनाथ पाटील, समीर ठाकूर, आदी काँग्रेस कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version