। पाताळगंगा । वार्ताहर ।
सद्गुरुमाता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या दिव्य शिकवणूकीच्या भारत वर्षातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांतील 1 हजार 533 ठिकाणी एकाच वेळी राबविण्यात आली. ज्यामध्ये 11 लाखाहून अधिक स्वयंसेवकांनी भाग घेतला. त्याचाच एक भाग म्हणून खालापूर येथील असलेला तलाव स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
तलावाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेवाळ तसेच, गाळ निर्माण झाला होता. हे पाणी पुन्हा दैनंदिन जिवनात वापरण्यासाठी उपयोग व्हावे यासाठी एक पाउल पुढे टाकून ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यासाठी हजारो अनुयायी या ठिकाणी उपस्थिती राहून सेवा बजविण्यांचे काम करीत आहे. जल है तो हम या उद्दात विचारांतून हा उपक्रम हाती घेण्यात आला.
प्रोजेक्ट अमृत अंतर्गत स्वच्छ जल, स्वच्छ मन ही परियोजना खालापूर शहरातील तलाव येथे राबविण्यात आली. या कार्यक्रमामध्ये कुलबहादूर कुवर, राजेश बैलमारे, बबन केदारी, खोपोली सेवादल संचालक, तसेच सावरोली सेवादल, निरंकारी सेवादल व अन्य निरंकारी भक्तगणांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. यावेळी खालापूर नगरपंचायत उपनगर अध्यक्ष संतोष जंगम, नगरसेवक राजेश पारठे प्रतिष्ठित नागरीक व जनसामान्यांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले