रेल्वेच्या कामाचा प्रवाशांना फटका

ये-जा करताना चिखल पाण्याचा सामना; प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |

नवीन पनवेल रेल्वे स्थानक परिसरात कर्जत रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात झाली असली, तरी या कामाचा फटका प्रवाशांना बसत आहे. कामासाठी मार्ग बंद करण्यात आल्याने प्रवाशांना सध्या चिखलातून पायवाट काढत रेल्वे स्थानकाच्या जिन्यापर्यंत पोहोचावे लागत आहे. त्यामुळे पावसाळ्यात प्रवाशांची अक्षरशः कसरत होत आहे.

पावसामुळे या पायवाटेवर मोठ्या प्रमाणात चिखल आणि पाणी साचत असल्याने ये-जा करणे कठीण झाले आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. चिखलामुळे पाय घसरून पडण्याची शक्यता असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कर्जत रेल्वे मार्गाचे काम महत्त्वाचे असले, तरी कामाच्या ठिकाणी प्रवाशांसाठी सुरक्षित पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मात्र, सध्या कोणतीही सुयोग्य व्यवस्था नसल्याने प्रवाशांना चिखलातूनच मार्ग काढावा लागत आहे. रात्रीच्या वेळी प्रकाशाची पुरेशी व्यवस्था नसल्यास ही गैरसोय आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासन आणि संबंधित कंत्राटदारांनी काम सुरू असलेल्या परिसराची पाहणी करून प्रवाशांसाठी तातडीने चिखलमुक्त व सुरक्षित पायवाट उपलब्ध करून द्यावी. तसेच आवश्यक ठिकाणी प्रकाशव्यवस्था आणि संरक्षक कठडे उभारावेत, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

पावसामुळे या पायवाटेवर मोठ्या प्रमाणात चिखल आणि पाणी साचत असल्याने ये-जा करणे कठीण झाले आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. चिखलामुळे पाय घसरून पडण्याची शक्यता असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. कर्जत रेल्वे मार्गाचे काम महत्त्वाचे असले, तरी कामाच्या ठिकाणी प्रवाशांसाठी सुरक्षित पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मात्र, सध्या कोणतीही सुयोग्य व्यवस्था नसल्याने प्रवाशांना चिखलातूनच मार्ग काढावा लागत आहे. रात्रीच्या वेळी प्रकाशाची पुरेशी व्यवस्था नसल्यास ही गैरसोय आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

सुरक्षिततेकडे दुर्लक्ष
रेल्वे प्रशासन आणि संबंधित कंत्राटदारांनी काम सुरू असलेल्या परिसराची पाहणी करून प्रवाशांसाठी तातडीने चिखलमुक्त व सुरक्षित पायवाट उपलब्ध करून द्यावी. तसेच आवश्यक ठिकाणी प्रकाशव्यवस्था आणि संरक्षक कठडे उभारावेत, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. विकासकामे सुरू असताना प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होऊ नये, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
Exit mobile version