श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पावसाची आडकाठी

| नवी दिल्ली | वृत्‍तसंस्था |

भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. टी-20 मालिकेत भारताने श्रीलंकेचा पराभव केला. यानंतर आता मालिकेतील पहिला सामना आज सुरू होणार आहे. ज्यामध्ये भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे असणार आहे आणि उपकर्णधारपदाची जबाबदारी शुबमन गिलकडे असेल. मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची ही पहिली एकदिवसीय मालिका असेल, ज्यामध्ये भारताने ही मालिका जिंकवण्यासाठी ते इच्छुक असतील. मात्र, हवामान खात्यानुसार, शुक्रवारी पहाटे 2 ते 3 या वेळेत कोलंबोमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता होती. दुपारी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. या कालावधीत पावसाची पातळी 50 टक्क्यांहून अधिक असेल. हा सामना दुपारी अडीच वाजता सुरू होणार आहे.

भारत संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा
श्रीलंका संघ : चारिथ असलंका (कर्णधार), पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, सादिरा समराविक्रमा, कामिंदू मेंडिस, झेनिथ लियानागे, निशान मदुष्का, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेलागे, चमिका करुणारत्ने, महिष टेकनशान, अकिला तिखाना, मदनशान, मदिरा हसरांगा. असिथा फर्नांडो
Exit mobile version