अभिनेते किरण मानेंचा दावा
। मुंबई । प्रतिनिधी ।
मराठी सिनेसृष्टीतले लोकप्रिय अभिनेते किरण माने त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळं चर्चेत असतात. आता त्यांनी शेअर केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी ठाण्यातील सभेत सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली होती. यावेळी त्यांनी अंधारे यांचा जुना व्हिडीओ दाखवला होता. यानंतर सुषामा अंधारे यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधत, त्यांच्यावर जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप केला. गेल्या वर्षी महिला कुस्तीपटूंना पाठिंबा देण्यासंदर्भात राज ठाकरे यांनी एक पत्र पंतप्रधानांना पाठवल्याचे म्हटले होते, पण हे खोटं आहे. पंतप्रधान कार्यालयात असे कोणतेही पत्र आलं नसल्याचे समोर आले आहे, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला.
‘महिला कुस्तीपटूंनी ज्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केलेले आहेत त्या ब्रिजभूषणवर कारवाई करा’, अशा आशयाचं पत्र राज ठाकरे यांनी थेट पंतप्रधानांना पाठवलं आहे, असे राज ठाकरेंनी जाहीर केले होते. एका वर्षापूर्वी, 31 मे रोजी सोशल मीडियावर ते पत्र पोस्ट केलं गेलं. ते पत्र प्रचंड व्हायरल झालं होते. ‘ब्रिजभूषणला आम्ही मुंबईत पाऊल ठेवू देणार नाही.’ असा इशाराही दिला होता. हा स्टंट असणार असा संशय काहीजणांना आला. ईडीच्या भीतीने घाबरलेले राजजी हे धाडस करणार नाहीत, अशी बर्याचजणांना खात्री होती. शेवटी माहितीच्या अधिकारात एकाने याविषयी अर्ज करून विचारणा केली. पंतप्रधान कार्यालयाकडून असे उत्तर आले की, ‘राज ठाकरे यांच्याकडून असं कुठलंही पत्र पंतप्रधान कार्यालयाला आलेले नाही.’ केवढी मोठी चालबाजी होती ही!
किरण माने यांनी पोस्ट एका पोस्टमध्ये लिहीले की, सुषमा अंधारेंनी अणुशक्तीनगर इथे हा पर्दाफाश केला तेव्हा मी तिथे हजर होतो. उपस्थित प्रचंड जनसमुदायातून ‘शेम शेम’ असा खुप मोठा आवाज येऊ लागला. लोकांना मनापासून या फसवणुकीचे वाईट वाटलेले दिसले.