| खोपोली | प्रतिनिधी |
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने खालापूरातील नारंगी- स्वाली येथील केसरी मैदानात बैलगाडा शर्यती नितीन सावंत यांच्या सौजन्यातून रविवारी(दि.18) आयोजित करण्यात आल्या होत्या. या बैलगाडा शर्यतीला जवळपास 30 हजार हून अधिक प्रेक्षकांची गर्दी करीत बैलगाडा शर्यतीचा आनंद लुटला. या शर्यतीत मथूर व सोन्या बैलाने प्रेक्षकांची मने जिंकली, तर या बैलगाडा शर्यतीत 200 हून अधिक बैल जोडीने फेरा मारत बैलगाडा शर्यतीमध्ये रंगत आणली.
यावेळी नितीन सावंत, भाई शिंदे, नवीन घाटवल, एकनाथ पिंगळे, उत्तम कोळंबे, सुवर्णा जोशी, एस एम पाटील, आत्माराम पाटील, उमेश गावंड, रमेश पाटील, निखिल पाटील, प्रशांत खांडेकर, महेश पाटील, उत्तम भोईर, नितीन पाटील, अविनाश आमले, दिनेश घाडगे, प्रविण पाटील, अशोक मराजगे, अनिता पाटील, शैला भगत, सुदाम पवाळी, बाबू घारे, ॲड.संपत हडप, पंढरीनाथ राऊत, बाजीराव दळवी, योगेश दाभाडे, समीर साळोखे, योगेश थोरवे, योगेश घोलप आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थितीत होते.
या बैलगाडा शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक वीर संदेश देशमुख -नारंगी, द्वितीय क्रमांक सममरा प्रतीक मढवी-नेरे पनवेल, तृतीय क्रमांक ऋषिकेश मारुती पाटील -माजगाव या बैल जोडी मालकांना सन्मानित करण्यात आले.
शर्यती यशस्वी करण्यासाठी दिनेश घाडगे, समीर पाटील, प्रवीण पाटील, राजू कडव, मनसुर वनडे, साई भोसले, शैलेश शिर्के, महेश पांचाल, अभी घोंगे, केदार पाटील, विवेक पाटील, नितीन भोइर, समीर पाटील, चेतन देशमुख, किरण देशमुख, रुपेश देशमुख, अमित पाटील, प्रदीप हेलंडे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह असंख्य बैलगाडा शर्यत प्रेमींनी मेहनत घेतली.