| पनवेल | प्रतिनिधी |
हुकूमशाही सरकारने सरकारला प्रश्न विचारले म्हणून 149 खासदारांचे निलंबन केल्याबद्दल शुक्रवारी पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजप सरकारचा इंडिया आघाडीतर्फे जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा संपर्क प्रमुख बबन पाटील, जिल्हा प्रमुख शिरीष घरत, शेतकरी कामगार पक्षाचे नेते, माजी आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, आर सी घरत, राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील, शिवसेना जिल्हा सल्लागार शिरीष बुटाला, तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, भावना घाणेकर, शिवसेना पनवेल शहर संघटिका अर्चना कुळकर्णी, माजी नगरसेविका निर्मला म्हात्रे, सुरेख मोहोकर, शशिकला सिंग, विद्या चव्हाण, शेकापचे नारायण घरत, राष्ट्रवादीचे सुदाम पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, महानगर समन्वयक दीपक घरत, महानगर प्रमुख एकनाथ म्हात्रे, तालुका प्रमुख विश्वास पेटकर, शहर प्रमुख प्रवीण जाधव, गुरुनाथ पाटील, हेमराज म्हात्रे, वैशाली कोळी, काँग्रेसचे वैभव पाटील, माजी नगरसेवक रवींद्र भगत, युवासेनेचे पराग मोहिते, शशिकांत बांदोडकर,आदींसह मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी भाजप विरोधात घोषणा देण्यात आल्या.
देशामध्ये मोदी आणि शहा यांचे सरकार असून ते या देशाची लोकशाही संपवत आहेत. सरकारसमोर जनतेचे कोणतेही प्रश्न मांडल्यास विरोधकांवर कारवाई करण्यात येते. देशामध्ये आज खऱ्या अर्थाने हिटलरशाही सुरू आहे. देशात भाजप सरकारची मनमानी सुरू असून विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी खासदारांचे झालेले निलंबन ही लोकशाहीची हत्याच आहे. परंतु या हुकूमशाहीला न जुमानता महाविकास आघाडी आजही तितक्याच ताकदीने भक्कमपणे लढा देत उभी आहे. अधिवेशनादरम्यान संसदेत विरोधी खासदारांचे निलंबन केल्यामुळे इंडिया आघाडीच्यावतीने केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आल्याची प्रतिक्रिया माजी आमदार बाळाराम पाटील यांनी व्यक्त केली.