आ.जयंत पाटील यांची लक्ष्यवेधीद्वारे मागणी
मुंबई | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील (जि. रायगड) भोनंग खाडी परिसरातील गावांमध्ये बाह्यकाठ्यांना खांडी पडल्याने शेती मोठ्या प्रमाणात नापिक झालेली आहे. त्या खांडी दुरुस्त केल्या जाव्यात, तसेच सरकारने या शेतकर्यांना अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई दिलेली नाही, ती तातडीने दिली जावी,अशी मागणी आम.जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत लक्ष्यवेधी सुचनेद्वारे केलेली आहे.
या संदर्भात उपस्थित केलेल्या मुद्यावर बोलताना ते म्हणाले की, नवखार, भागवाडी, तळवली, भोनंग, ताजपूर, बापळे, फणसापूर, दिवी पारंगी, वरसगांव आदी गावांतील शेतक-यांच्या भातशेत जमिनी असणे, शेतीच्या संरक्षणासाठी बांधण्यात आलेल्या खारबंदिस्त बंधा-याच्या बाह्यकाठयाला समुद्राच्या उधानाच्या भरतीचे पाणी तसेच अतिवृष्टी व पुरामुळे सदर बाह्यकाठ्यांना खांडी ( भगदाडे) पडल्यामुळे खाडीतील समुद्राचे पाणी शेतीत घुसून शेती नापिक झालेली आहे.असे त्यांनी निदर्शनास आणले.
बाह्यकाठा दुरुस्ती करण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना म्हणून खारभूमी विभागाने बाह्यकाठ्याची डागडुजी करणे अपेक्षित असताना खारभूमी विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने भोनंग खाडी परिसरात असणारी सुमारे 500 हेक्टर भात पीक शेत जमीन नापीक होण्याच्या मार्गावर असणे, वारंवार खारभूमी विभागाकडे ग्रामस्थांनी संरक्षक बंधार्यांचे व बाहयकाठ्याची डागडुजी करण्याची मागणी करुनही या मागणीकडे खारभूमी बिभागाकडून दुर्लक्ष करण्यात येणे, भानंग व वरसगांव खारभूमी योजनेतील खार बंदीस्त बंधा-याच्या बाहयकाठ्याला पडलेल्या खांडीचे कामे हे सुडकोली ग्रामपंचायत हद्दीतील शेतकरी ग्रामस्थांनी केलेली असून त्याचा मोबदला त्या ग्रामस्थांना अद्याप देण्यात आलेला नसल्यामुळे त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला मिळणे आवश्यक आहे. तसेच सदर काम हे एजन्सी मार्फत न करता ग्रुप ग्रामपंचायत सुडकोली मार्फत करण्यात आले तर तेथील ग्रामस्थांना रोजगारही उपलब्ध होईल,असे ते म्हणाले.
तसेच रायगड जिल्हयातील खारेपाट भागातील शेतक-यांच्या शेत जमिनीचीही ही अवस्था अशीच असणे, सबब भोनंग खाडी किनारी असणा-या शेत जमिनीत समुद्राचे खारे पाणी शिरु नये यासाठी शेत जमिनीचे संरक्षण करण्यासाठी बांधण्यात आलेल्या खारवंदिस्ती बंचा-यांची व खांडी भगदाड पडलेल्या चाहयकाठ्याची तातडीने दुरुस्ती करून सदर प्रश्न कायमस्वरुप सोडविण्यासाठी शासनाने केलेली उपाययोजना व करावयाची कार्यवाही.
आम.जयंत पाटील यांच्या या लक्ष्यवेधीवर खारलॅन्ड मंत्र्यांनी उत्तर दिले आहे. खारभूमी विकास कार्यक्रमांतर्गत कोकणातील पाच जिल्हयातील बृहत आराखड्यामधील 575 खारभूमी योजनांपैकी मे-2021 अखेर 416 योजना पूर्ण करण्यात आल्या असून त्याद्वारे 41383 हे. क्षेत्र पुनः प्रापीत झाले आहे. यामध्ये रायगड जिल्हयातील बृहत आराखड्यामधील 165 योजनांपैकी 135 खारभूमी योजनांची कामे मार्च 2029 अखेर पूर्ण करण्यात आली असून 20103 हेक्टर क्षेत्र पुनःप्रापीत करण्यात आले आहे. सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी रायगड विभागास रू.16.04 कोटी निधी मूळ बांधकामासाठी. रू.12.59 कोटी निधी विस्तार व सुधारणा कामासाठी व रू. 4.90 कोटी सर्वेक्षण व रू.1.33 कोटी परीरक्षण व दुरूस्ती असा एकूण 34.86 कोटी निधी मंजूर आहे. तथापि कोवीड-19 महामारीमुळे दि. 24 जून 2021 रोजीच्या वित्त विभागाचे शासन निर्णयानुसार मंजूर तरतुदीच्या 60 टक्के प्रमाणे रू.20.91 कोटी इतकाच निधी खर्च करणेचे दष्टीने नियोजन केले आहे.असे ते म्हणाले.