उरणमधील नागरी सुविधा सोडवा; शेकापची मागणी

| उरण । वार्ताहर ।

उरण शहरातील नागरी सुविधा बाबत नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांना शेतकरी कामगार पक्षाचे शहर चिटणीस शेखर पाटील यांनी शिष्टमंडळा समवेत निवेदन सादर केले. या निवेदनात शहरातील आनंद नगर, राजपाल नाका, कोटनाका, गणपती चौक, विवेकानंद चौक येथील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सुनियोजित धोरण आखण्याची विनंती केली. तसेच रस्त्यावरील वाहतूक कोंडी अडथळे दूर करण्यासाठी भरारी पथक नेमण्याचे सांगितले.

शहरातील पदपथ मोकळे करून ज्येष्ठ नागरिक व महिलांना चालण्यासाठी मोकळे करा तसेच अनधिकृत बांधकामांवर कारवाई, थकीत पाणी पट्टी न भरल्यामुळे शहराला एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होत नाही यासाठी थकीत पाणीपट्टी अदा करून शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार पाणीपुरवठा वाढवावा, एमएमआरडीच्या माध्यमातून रस्ते तयार करण्यात आले रस्ते अर्धवट आहेत. रस्ते अर्धवट व रस्त्यावर विद्युत पोल यामुळे एसटी वाहतूक बंद आहे. यासाठी त्वरित उपायोजना करावी. लाल मैदानात कायमस्वरूपी रखवालदार नेमावा. अशी मागणी करण्यात आली.

यावेळी मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. शहरातील समस्याकडे प्राधान्याने लक्ष देणार असल्याचे शिष्ट्य मंडळाला मुख्याधिकार्‍यांनी सांगितले. यावेळी शहर चिटणीस शेखर पाटील यांनी या समस्या बाबत प्रत्येक विभागाला भेट देऊन तेथील समस्या सोडवण्यासाठी आवाहन केले. शिष्ट मंडळाच्या मागणी नुसार मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी प्रत्येक विभागाला भेट देण्याचे मान्य केले. उरण शहराच्या नागरी समस्या सोडवण्यासाठी शेकाप कटिबद्ध आहे. विकास कार्यात शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, आ. बाळाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेकाप आपल्या सोबत असल्याचे सांगितले.

यावेळी तालुका सहचिटणीस यशवंत ठाकूर, महिला आघाडी अध्यक्ष सीमा घरत, शहराध्यक्ष नयना पाटील, शहर उपाध्यक्ष रंजना पाटील, चिंतामण गायकवाड, अनंत घरत, दिलीप पाटील, नारायण पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version