| माणगाव | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. शनिवारी (दि. 31) रिक्षा व आयशर टेम्पोमध्ये अपघात होऊन तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, शनिवारी मुंबई-गोवा महामार्गावर कशेणे गावाच्या हद्दीत दुपारी तीन वाजताच्या सुमारास ऑटो रिक्षा क्र. एमएच 46 बीपी 1442 व आयशर टेम्पो क्र. एमएच 04 एलक्यू 3408 यामध्ये अपघात होऊन शेवंती लक्ष्मण कोळी (45), रा. कशेणे आदिवासी वाडी व नंदा मारुती पवार (35), रा कोशिंबळे व सुनिता या तिघांचा मृत्यू झाला असून, संगीता मनोहर वाघमारे (20) व मयुरी मनोहर वाघमारे (15) दोन्ही रा. कशेणे आदिवासी वाडी या जखमी झाल्या आहेत. अपघाताची बातमी मिळताच माणगांव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे आणण्यात आले होते.
रिक्षा-आयशर टेम्पोचा अपघात; तिघांचा मृत्यू
![](https://krushival.in/grygrars/2024/06/IMG-20240531-WA0044-e1717250254681.jpg)