। अलिबाग । प्रतिनिधी ।
अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई या संस्थेतर्फे अलिबागचे कवी अनंत केशव देवघरकर ह्यांना साहित्यभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 24 डिसेंबरला हा सोहळा पार पडला. अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई या संस्थेचे अनेक कवी सदस्य असून त्या संस्थेचे अध्यक्ष शिवाजी खैरे सर हे मराठी साहित्यसंवर्धनासाठी सातत्यपूर्वक प्रयत्नशील असतात. या संस्थेतर्फे अक्षरमंच काव्यलेखन स्पर्धा या नावाने राज्यस्तरीय काव्यस्पर्धा दर महिन्याला घेतली जाते. ही स्पर्धा दिलेल्या तीन विषयांपैकी एका विषयावर दिलेल्या काव्य प्रकारात लिहिणे बंधनकारक असते.
जे कवी सातत्यपूर्वक 12, 24, आणि 36 महिने विना खंड सहभाग घेऊन यशस्वी होतात, त्यांना अष्टपैलू काव्यलेखन राज्यस्तरीय गौरव पुरस्कार, अष्टपैलू काव्यलेखन राज्यस्तरीय काव्यभूषण गौरव पुरस्कार, अष्टपैलू काव्य लेखन राज्यस्तरीय साहित्यभूषणगौरव पुरस्कार देऊन गौरविले जाते. कवी देवघरकर यांनी 36 स्पर्धांत सहभाग घेऊन तिन्ही सन्मान संपादन केले आहेत. यासाठी त्यांना प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह आणि संस्थेच्या न्यायप्रभात या मासिकाचे अंक देऊन सन्मानित करण्यात आले.
निमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषद अलिबाग शाखेमार्फत देवघरकर यांचा डॉ.वाजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. देवघरकर यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. ही स्पर्धा आणखी बारा महिने देऊन अष्टपैलू संस्थेचा काव्यरत्न गौरवपुरस्कार संपादन करण्याचा त्यांचा मानस आहे. ते महात्मा गांधी विद्यालय हाशिवरे, अलिबागचे माजी प्राचार्य आहेत.