पाच जण किरकोळ जखमी
| पुणे | प्रतिनिधी |
चऱ्होली गावालगत 20 ते 25 विद्यार्थी घेऊन निघालेल्या स्कुल बसचा अपघात झाला आहे. हा अपघात दुपारच्या सुमारास झाला आहे. सर्व विद्यार्थ्यांना बसमधून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या अपघातात चार ते पाच विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. पिंपरी चिंचवडमध्ये काळ आला होता, पण वेळ नाही अशी म्हणायची वेळ आली.
अपघातग्रस्त बस इंद्रायणी नदीत बस कोसळता-कोसळता थोडक्यात बचावली. सुदैवाने बसचे चाक पुलाच्या बॅरेंगेटिंगमध्ये अडकले. अन्यथा विद्यार्थ्यांसह ही बस नदीत बुडाली असती. आज (दि.4) दुपारी साडे तीनच्या सुमारास झाला. सर्व विद्यार्थ्यांना बसमधून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या अपघातात चार ते पाच विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात नेमका कसा झाला हे अद्याप कळू शकलेले नाही. मात्र, सुदैवाने कोणतीही जिवितहानी न झाल्याने अनर्थ टळला आहे.