शिवभोजन थाळी सुरूच

। मुंबई । वृत्तसंस्था ।
शिवभोजन थाळी योजनेत गैरव्यवहार झाल्याच्या संशयावरून महाविकास आघाडीच्या काळात सुरू करण्यात आलेली शिवभोजन थाळी बंद होणार, अशी चर्चा होती. मात्र, शिवसेनेच्या पुढाकाराने मविआ सरकारने सुरु केलेली शिवभोजन थाळी यापुढेही सुरु राहणार आहे. मंगळवारी पार पडलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिवभोजन थाळी सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही थाळी बंद होणार अशी चर्चा सुरू असताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ही थाळी सुरू राहिल, असे आश्‍वासन दिले होते. त्यानंतर मंत्रीमंडळाच्या बैठकीत ही थाळी सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री शिवभोजन थाळीचा घेणार आढावा घेतील, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.

Exit mobile version