शिवचरित्र अनेकांनी लिहिलं आहे. पण बाबासाहेबांनी ते घराघरात पोहोचवलं आणि मनामनात झिरपवलं. खरं सांगायचं तर केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात पोहोचवलं. आपला इतिहास विसरलेल्यांना बाबासाहेबांनी या गोष्टींची जाणीव करून दिली. मग ते व्याख्यानाच्या रूपाने असेल, नाटकाच्या रुपाने असेल, पुस्तकाच्या रूपाने असेल वा अन्य कोणत्या रुपाने… मी एकदा रायगडावर त्यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी त्यांना एक प्रश्न विचारला होता. तो म्हणजे बाबासाहेब तुम्ही कधी पोवाडा म्हटला आहे का? कधीच नाही, हे त्यावर त्यांचं उत्तर! मग मी म्हटलं की पोवाडा म्हटलाच नाही तर तुम्ही शिवशाहीर कसे? यावर ते फक्त हसले होते. आता त्यांचं ते लोभस हास्य पुन्हा दिसणार नाही. पण ते कधीच जनतेच्या स्मृतीतून दूर जाणार नाहीत. समाजमनात त्यांचं स्थान कायमचं अग्रणी असेलफ, असं म्हणत राज ठाकरे त्यांना विनम्र आदरांजली वाहतात.
शिवचरित्र घराघरात पोहोचविले – राज ठाकरे
-
by Krushival

- Categories: राज्यातून
- Tags: Babasaheb Purandaremarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraj thakarey
Related Content
राज्यात पावसाचा जोर वाढणार
by
Sanika Mhatre
July 26, 2026
शिवतीर्थावर विजयाचा जल्लोष
by
Sanika Mhatre
July 26, 2026
शाळांच्या वेळेत वाहतूक कोंडी
by
Sanika Mhatre
July 26, 2026
उद्याचा मोर्चा होणारच!
by
Antara Parange
July 25, 2026
कल्याणच्या उत्पादन शुल्क कार्यालयाला आग
by
Antara Parange
July 25, 2026
उद्या राज्यात ड्राय डे
by
Sanika Mhatre
July 24, 2026