शिवचरित्र अनेकांनी लिहिलं आहे. पण बाबासाहेबांनी ते घराघरात पोहोचवलं आणि मनामनात झिरपवलं. खरं सांगायचं तर केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात पोहोचवलं. आपला इतिहास विसरलेल्यांना बाबासाहेबांनी या गोष्टींची जाणीव करून दिली. मग ते व्याख्यानाच्या रूपाने असेल, नाटकाच्या रुपाने असेल, पुस्तकाच्या रूपाने असेल वा अन्य कोणत्या रुपाने… मी एकदा रायगडावर त्यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी त्यांना एक प्रश्न विचारला होता. तो म्हणजे बाबासाहेब तुम्ही कधी पोवाडा म्हटला आहे का? कधीच नाही, हे त्यावर त्यांचं उत्तर! मग मी म्हटलं की पोवाडा म्हटलाच नाही तर तुम्ही शिवशाहीर कसे? यावर ते फक्त हसले होते. आता त्यांचं ते लोभस हास्य पुन्हा दिसणार नाही. पण ते कधीच जनतेच्या स्मृतीतून दूर जाणार नाहीत. समाजमनात त्यांचं स्थान कायमचं अग्रणी असेलफ, असं म्हणत राज ठाकरे त्यांना विनम्र आदरांजली वाहतात.
शिवचरित्र घराघरात पोहोचविले – राज ठाकरे
-
by Krushival

- Categories: राज्यातून
- Tags: Babasaheb Purandaremarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraj thakarey
Related Content

विमानतळ नोकरीच्या नावाखाली खोट्या जाहिरातींचा सुळसुळाट
by
Sanika Mhatre
August 22, 2025

'या' वाहनांना अटल सेतूवरून मोफत प्रवास
by
Antara Parange
August 22, 2025
कालव्यात कार कोसळून दोघांचा मृत्यू
by
Antara Parange
August 22, 2025
तारापूरमधील फार्मा कंपनीत वायुगळती; चार जणांचा मृत्यू
by
Antara Parange
August 22, 2025
धक्कादायक! तरुण अभियंत्याचा निर्घृण खून
by
Sanika Mhatre
August 22, 2025
सरकारी वकिलाने कोर्टातच जीवन संपवल
by
Sanika Mhatre
August 21, 2025