शिवचरित्र अनेकांनी लिहिलं आहे. पण बाबासाहेबांनी ते घराघरात पोहोचवलं आणि मनामनात झिरपवलं. खरं सांगायचं तर केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात पोहोचवलं. आपला इतिहास विसरलेल्यांना बाबासाहेबांनी या गोष्टींची जाणीव करून दिली. मग ते व्याख्यानाच्या रूपाने असेल, नाटकाच्या रुपाने असेल, पुस्तकाच्या रूपाने असेल वा अन्य कोणत्या रुपाने… मी एकदा रायगडावर त्यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी त्यांना एक प्रश्न विचारला होता. तो म्हणजे बाबासाहेब तुम्ही कधी पोवाडा म्हटला आहे का? कधीच नाही, हे त्यावर त्यांचं उत्तर! मग मी म्हटलं की पोवाडा म्हटलाच नाही तर तुम्ही शिवशाहीर कसे? यावर ते फक्त हसले होते. आता त्यांचं ते लोभस हास्य पुन्हा दिसणार नाही. पण ते कधीच जनतेच्या स्मृतीतून दूर जाणार नाहीत. समाजमनात त्यांचं स्थान कायमचं अग्रणी असेलफ, असं म्हणत राज ठाकरे त्यांना विनम्र आदरांजली वाहतात.
शिवचरित्र घराघरात पोहोचविले – राज ठाकरे
-
by Krushival

- Categories: राज्यातून
- Tags: Babasaheb Purandaremarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraj thakarey
Related Content
हातोडीने मारहाण करून खंडणीची मागणी
by
Sanika Mhatre
April 12, 2026
संगीत विश्वातील 'स्वर' हरपला; ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन
by
Krushival
April 12, 2026
छगन भुजबळ अपघातातून थोडक्यात बचावले
by
Antara Parange
April 11, 2026
कोल्ड्रिंकच्या टिनमध्ये शिरला नाग
by
Antara Parange
April 11, 2026
हिंगोली, नांदेड, परभणीसह वाशीममध्ये भूकंपाचे धक्के
by
Antara Parange
April 11, 2026
भाईंदरमध्ये अग्नितांडव! तीन जणांचा होरपळून मृत्यू
by
Antara Parange
April 11, 2026