शिवचरित्र अनेकांनी लिहिलं आहे. पण बाबासाहेबांनी ते घराघरात पोहोचवलं आणि मनामनात झिरपवलं. खरं सांगायचं तर केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात पोहोचवलं. आपला इतिहास विसरलेल्यांना बाबासाहेबांनी या गोष्टींची जाणीव करून दिली. मग ते व्याख्यानाच्या रूपाने असेल, नाटकाच्या रुपाने असेल, पुस्तकाच्या रूपाने असेल वा अन्य कोणत्या रुपाने… मी एकदा रायगडावर त्यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी त्यांना एक प्रश्न विचारला होता. तो म्हणजे बाबासाहेब तुम्ही कधी पोवाडा म्हटला आहे का? कधीच नाही, हे त्यावर त्यांचं उत्तर! मग मी म्हटलं की पोवाडा म्हटलाच नाही तर तुम्ही शिवशाहीर कसे? यावर ते फक्त हसले होते. आता त्यांचं ते लोभस हास्य पुन्हा दिसणार नाही. पण ते कधीच जनतेच्या स्मृतीतून दूर जाणार नाहीत. समाजमनात त्यांचं स्थान कायमचं अग्रणी असेलफ, असं म्हणत राज ठाकरे त्यांना विनम्र आदरांजली वाहतात.
शिवचरित्र घराघरात पोहोचविले – राज ठाकरे
-
by Krushival

- Categories: राज्यातून
- Tags: Babasaheb Purandaremarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraj thakarey
Related Content
अचूक कर आकारणी ग्रामपंचायतीची जबाबदारी
by
Sanika Mhatre
June 8, 2026
Suicide News: अटल सेतूवरून तरुणाची समुद्रात उडी
by
Sanika Mhatre
June 8, 2026
मुंबईत बेस्ट बसचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू
by
Sanika Mhatre
June 8, 2026
LPG Price Hike: महागाईचा पुन्हा झटका! घरगुती सिलिंडर महागला
by
Sanika Mhatre
June 7, 2026
Rice Sowing: शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई टाळा!
by
Sanika Mhatre
June 7, 2026
48 तासांत मान्सून महाराष्ट्रात
by
Sanika Mhatre
June 5, 2026