| पाली | वार्ताहर |
सुधागड वासीयांना शुद्ध, थंड व आरोचे पाणी अवघ्या एक रुपयांत उपलब्ध करण्यात आले आहे. भाजप प्रदेश सदस्य व दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा यांच्या पुढाकाराने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पालीतील हटाळेश्वर चौक येथे हे श्रीराम जल सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे. पाली हे सुधागड तालुक्याचे मुख्यालयाचे ठिकाण आहे. तसेच अष्टविनायक तीर्थक्षेत्र देखील आहे. येथे कामानिमित्त असंख्य लोक व भाविक येत असतात. अशावेळी त्यांना शुद्ध व थंड पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने श्रीराम जल सुरू करण्यात आले आहे. यास तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळत असून रोज असंख्य लोक श्रीराम जल पीत आहेत.