आ. जयंत पाटील यांचा अभीष्टचिंतन सोहळा रद्द

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे होणारा अभीष्टचिंतन सोहळा यावर्षी कोरोना आजाराच्या पार्श्‍वभूमीवर शासकीय निर्बंधांचे पालन करीत रद्द करण्यात आला आहे.

याबाबत आमदार जयंत पाटील अभीष्टचिंतन समितीच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, शेतकरी कामगार पक्षाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस आणि आपले लाडके आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस आपण दरवर्षी उत्साहाने साजरा करतो. परंतु, यावर्षी कोरोना विषाणूजन्य परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर आमदार जयंत पाटील यांनी आपला वाढदिवस साजरा करणार नसल्याचे जाहीर केले आहे.

मागील वर्षीसुद्धा कोरोनाच्या पार्श्‍वभूमी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. यावर्षीसुद्धा दि. 7 जुलै रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोणताही कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही. तसेच अधिवेशन काळ सुरु असल्याने आ. जयंत पाटील कुटुंबियासमवेत मुंबई येथे वास्तव्यास आहेत. त्यामुळे ते यादिवशी कोणालाही व्यक्तिगत भेटणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. तरी आपण सर्वांनी या आवाहनाद्वारे याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन अभीष्टचिंतन समितीचे समन्वयक प्रदीप नाईक यांनी केले आहे.

Exit mobile version