| मुंबई | प्रतिनिधी |
प्रहार संघटनेचे नेते आ. बच्चू कडूंनी शेतकर्यांच्या मुद्द्यावर सरकारला निर्णय घ्यावा लागेल, अशी ठाम भूमिका मांडली आहे. शेतकर्यांच्या मुद्द्यांवर सरकारची भूमिका पाहून आम्ही पुढचा निर्णय घेऊ. आपण शेतकरी म्हणून विधानसभेत आलं पाहिजे. पण इथे सगळे आमदार पक्षाचे म्हणून येतात. आमचा 10-15 आमदारांचा जर एखादा गट शेतकर्यांच्या प्रश्नांवर नेहमी आक्रमक राहिला, तर त्यासंदर्भात चांगले निर्णय होऊ शकतात, असं म्हणत बच्चू कडूंनी स्वतंत्र लढण्याचे संकेत दिले आहेत. शेतकरी, मजुरांच्या प्रश्नांवर आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू. ते काय सकारात्मकता दाखवतायत ते बघू. जर त्यांच्या सरकारकडून हे नाही झालं, तर किमान मी तरी 15-20 ठिकाणी उमेदवार उभे करून स्वतंत्र लढणार, असं ते म्हणाले.