| रायगड | प्रतिनिधी |
डाक विभागातर्फे खास डाक जीवन विमा अभियानाचे आयोजन 10 जुलै ते 15 जुलै आणि 17 जुलै ते 22 जुलै असे करण्यात आले आहे. त्याचा फायदा सर्व जनतेने करून घ्यावा असे आवाहन रायगड डाक विभागाचे नव निर्वाचित अधीक्षक सुनील थळकर यांनी केले आहे. रायगड डाक विभागाला स्थानिक डाक अधीक्षक लाभण्याचा योग मिळाला आहे. सर्व सामान्य ग्रामीण जनतेसाठी असणाऱ्या केंद्र सरकारचा डाक विमा तसेच अल्प बचत योजना ग्रामीण भागापर्यन्त पोहचवण्याचा मानस थळकर यांनी व्यक्त केला. त्यांनी ऑनलाइन व्हीसी द्वारे कर्मचारी वर्गाशी संपर्क साधून त्यांना या अभियाना बाबत माहिती दिली. डाक जीवन विम्याची सुरुवात 1 फेब्रुवारी 1884 रोजी झाली आहे. आतापर्यंत या योजनेला 137 वर्ष पूर्ण झाली आहेत. तरीही ही योजना सर्व सामान्यापर्यंत पोहचलेली दिसत नाही, मुळात केंद्र सरकारचा असणारा डाक विभाग व त्याच्याकडून चालवली जाणारी ही पॉलीसी अतिशय सुंदर असून हीचा लाभ सर्वांना घेता येत नाही. त्यासाठी वय वर्ष 19 ते 55 अशी पात्रता आहे.
सोबत ती व्यक्ती केंद्र,राज्य, जिल्हा, महामंडळ, शाळा, हॉस्पिटल आदी सरकारी यंत्रणेमध्ये काम करणारी असावी. सद्यस्थिती यामध्ये (नेशनल/बॉम्बे स्टोक एक्सेंज )शेअरबाजारात समभाग असणाऱ्या कंपन्याचा कर्मचारी वर्ग, तसेच इंजिनिअर, डॉक्टर, वकील आदी प्रोफेशनल आणि आता डिग्री, डिप्लोमाधारक या व्यक्तींचाही समावेश करण्यात आला आहे. तरीही ही पॉलिसी सर्वांनाच घेता येत नाही. त्यामुळेच फक्त ग्रामीण भागासाठी ग्रामीण डाक जीवन विमा योजना काढली गेली ज्यामध्ये ग्रामपंच्यात हद्दीतील रहिवाशी सहभागी होऊन ही पॉलिसी घेऊ शकतात. ग्राहकाला कमीत कमी हप्ता व जास्तीत जास्त बोनस ही पॉलिसी देतेच सोबत राष्ट्रपतिच्या वतीने ही पॉलिसी दिली जाते याची माहिती ग्राहकांना नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. केंद्र सरकारच्या ग्रामीण डाक जीवन व डाक जीवन विम्याच्या बाबत सर्वसामान्य विमा धाराकांसाठी पूर्वी काढलेली विमा पॉलिसी जी बंद अवस्थेत आहे. ती पुन्हा चालू करण्याची अजून एक संधी या सोबत ग्राहकांना दिली आहे. त्याचा लाभ सर्व ग्राहकांनी घ्यावा असे आव्हान सहयक डाक आधीक्षक सुनील पवार यांनी केले.