कामाच्या नावाने बोंबाबोंब
। सुधागड-पाली । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यात सरकारी कार्यालयात कर्मचार्यांचा कायम अभाव पाहायला मिळत आहे. कर्मचारीवर्गाची पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागातील जनतेचे अतोनात हाल होत आहेत. सुधागड येथील भूमी अभिलेख कार्यालय यातून सुटलेला नाही. सरकारी काम बारा महिने थांब या म्हणीप्रमाणे अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. जवळपास 9 पदे कित्येकवर्षे रिक्त आहेत.
हि पदे रिक्त असल्याने कार्यालयाची कित्येक महत्वाची कामे रखडली आहेत. अर्ज करून देखील कित्येक शेतकरी वर्गाच्या मोजण्या रखडल्या आहेत. उपअधीक्षक भूमी अभिलेखकार्यालयाचेकामाच्या बाबतीत बोंबाबोंब सुरु आहे. उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात निमतादार एक पद, आवक जावक सांभाळणार असलेल्या कर्मचार्याचे एक पद, छाननी लिपिक एक पद, दुरुस्ती लिपिक एक पद, शिपाई चार पद अशी पदे कित्तेक महिने रिक्त आहेत.
या कार्यालयात जमीन मोजणीसाठी चार कर्मचारी आहेत. शासनाच्या अश्या कारभारामुळे शासनाचे तर नुकसान होतच आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील जनतेचे देखील नुकसान होत आहे. संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष न करता त्वरित रिक्त पदे भरावीत आणि कामचुकार कर्मचार्यांवर कठोर कारवाई करावी जेणेकरून सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागणार नाही. याबाबत योग्य ती पावल उचलावीत अशी मागणी जोर धरत आहे.