उरण | वार्ताहर |
तळोजा येथील बाळासाहेब ठाकरे विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालय व छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावर वर मतीफ या पथनाट्याचे सादरीकरण केले. स्त्रीयांवरील अत्याचार आणि स्त्रीभूण हत्येवर आधारीत आसलेल्या या पथनाट्याच्या माध्यमातून ऐन नवरात्रीत समाजाला एक सुंदर संदेश विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिला.
यावेळी मुंबई उच्च न्यायालयात,दिवाणी व सत्र न्यायालय मुंबई चे सर्व न्यायाधीश, रेल्वे न्यायालयाचे न्यायाधीश व पोलीस कर्मचारी ठाकरे विधी महावीद्यालयाचे चे प्राचार्य डॉ.राजेश साखर,विद्यार्थी उपस्थि होते.
हे पथनाट्य स्वातंत्र्याचा आमृतमहोत्सव कार्यक्रमा आंतर्गत बाळासाहेब ठाकरे विधी महाविद्यालय तळोजा आणि तालुका विधी समिती पनवेल याच्या संयुक्त विद्यमाने सादर केल गेले. पथनाट्याचे लेखन व दिग्दर्शन अजय जोशी यांनी केले. या समाजजागृती बाबत उच्चन्यायालयाच्या न्यायमूर्तीने कौतूक केलं पथनाट्यामध्ये मध्ये शुभम तिवारी,शैलेश गोळे, सागर कांबळे,अजय जोशी ,विवेक भोपी,विकेश पवार,वासिम शेख,अनिल थोरात,सचिन साकत,अश्विनी कटारे स्नेहा मोर्बेकर्, रुपाली पाटील,नम्रता खानवालकर,सयाजी वाघमारे,विजय कलोते,अक्षय पाटील,अविनाश कदम,सुनैना माने,कमलाकर सोनार,प्रवीण ज़ितेकर,सायली गुरव, तेजश्री बहिरा या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.