। नेरळ । वार्ताहर ।
नेरळ येथील विद्या मंदिर मंडळाकडून दरवर्षी शांताबाई नाडकर्णी वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेत कर्जत, खालापूर आणि अंबरनाथ तालुक्यातील माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेची सांघिक विजेतेपद नेरळ विद्या विकास शाळा यांनी पटकावला.
स्पर्धेचा शुभारंभ प्रसंगी विद्या मंदिर मंडळाचे संयुक्त सचिव विवेक पोतदार, डॉ. मिलिंद पोतदार, आसावरी काळे, प्रमोद विचवे, मछिंद्र परदेशी, डी .एस. गजभिये, राजू झुगरे, राखी पोद्दार, सुमित्रा गायकवाड आदी प्रमुख उपस्थित होते.
वक्तृत्व स्पर्धेत माध्यमिक वरिष्ठ गट आठवी ते बारावी नेरळ विद्या विकास शाळेची दक्षता संतोष डुकरे प्रथम, तर चैतन्या सुभाष पेरणे दुसरी, तसेच तिसरा क्रमांक नेरळ विद्या मंदिर शाळेची गीत गजानन भंडारे आणि चतुर्थ क्रमांक अनंता शिसवे यांना देण्यात आले. कनिष्ठ गट पाचवी ते सातवी गटामध्ये प्रथम क्रमांक नेरळ विद्या मंदिर शाळेची धन्वनतरी महांगरे, तर दुसरा क्रमांक अभिनव प्रशाला कर्जत येथील साहिल सिनारे, तसेच तिसरा क्रमांक विद्या विकास मंदिर नेरळ येथील रिया शंकर पाटील आणि चतुर्थ क्रमांक तेजल तुकाराम सावंत याने मिळविला.