। आगरदांडा । प्रतिनिधी ।
रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे असे आपण मानतो. त्यामुळे रक्तदान हे समाजसेवेचेच एक मोठे काम आहे. रक्तदानामुळे अनेकांना जीवनदान मिळते. कोणाला काहीतरी देण ही आजच्या घडीला खूप मोठी गोष्ट आहे, असे प्रतिपादन माजी वैद्यकीय अधिकारी डॉ.मंगेश पाटील यांनी आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी केले.
श्रीयश हॉस्पिटल व मुरुड महादेव कोळीवाडा, कच्छ युवक संघ पेण आणि शासकीय रक्तपेढी जिल्हा रुग्णालय अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात मुरुड-राजपुरी कोळीवाड्यातील तरुण व महिला स्वतःच्या मर्जीने आणि उत्स्फूर्त आणि अखंड सहभाग हे या भागाचे वैशिष्ट्य दिसून आले. या रक्तदान शिबीरात विक्रमी 239 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी मकबुल कोकाटे, मनोहर बैले, डॉ.मंगेश पाटील, चिंतामणी मकु, अंजली पाटील, कच्छ युवक संघ पेण अध्यक्ष धनेश शहा, विजय सुर्वे, डॉ.इप्सित पाटील, संदिप पांगे,राकेश कुलाबकर, माजी नगराध्यक्षा स्नेहा पाटील, डॉ.किशोर बडगुजर, डॉ.राजेश पाटील, डॉ.हेमकांत सोनार, डॉ.पुनम पाटील, प्रशांत तुरुरे, ललीत पाटील, दिपक मोकल, ऋतुजा पाटील, निकिता चोरड, धनेश शहा, जितेंद्र मकु, प्रल्हाद मकु, ऋत्विक मकु, सुरेंद्र मकु, उमेश पाटील, महेश घाडगे आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली. सदर शिबीराच्या यशस्वीतेसाठी श्री साई रक्त सेंटर पनवेल, कच्छ युवक संघ पेण आणि शासकीय रक्तपेढी जिल्हा रुग्णालय अलिबाग यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ऋत्विक मकु यांनी केले.