नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
शेतकरी आंदोलनासाठी 46 शेतकरी संघटनांनी मिळून तयार केलेल्या संयुक्त किसान मोर्चानं स्वराज अभियानचे प्रमुख आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांचं निलंबन केले आहे. हे निलंबन एक महिन्यासाठी असणार आहे. लखीमपूर खेरीमध्ये भाजप नेते आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या गाडीखाली शेतकर्यांना चिरडल्यानंतर संतप्त आंदोलकांनी गाडीत असलेल्या आरोपींना बेदम मारहाण केली. यात भाजपच्या कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. योगेंद्र यादव यांनी या मृत भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबाची भेट घेतल्यानं संयुक्त किसान मोर्चानं ही निलंबनाची कारवाई केली आहे.